AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

e-bikes खरेदीत महाराष्ट्राने ओलंडला इतक्या लाखांचा टप्पा, देशात रचला इतिहास

e-bikes | देशात इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात महाराष्ट्राने त्यात विक्रम नोंदवला आहे. देशात सर्वाधिक ई-बाईकची खरेदी राज्यात झाली आहे. याविषयीची आकडेवारी सर्वांचेच लक्ष वेधणारी आहे. गेल्या 50 दिवसांत तर राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. 40,000 नवीन ई-बाईक्सची नोंदणी झाली आहे.

e-bikes खरेदीत महाराष्ट्राने ओलंडला इतक्या लाखांचा टप्पा, देशात रचला इतिहास
| Updated on: Nov 07, 2023 | 10:37 AM
Share

निवृत्ती बाबर, मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : देशात सध्या ई-बाईक्सची मोठी मागणी आली आहे. इलेक्ट्रिक बाईक्सच्या किंमती अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्या तरी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींनी या वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. केंद्र सरकारने ई-बाईक्सला चालना देण्यासाठी काही सवलती दिल्या आहेत. त्याचा पण परिणाम दिसून आला आहे. महाराष्ट्राने तर प्रदुषणरहित वाहनांना मोठी पसंती दिली आहे. देशात सर्वाधिक ई-बाईकची नोंद राज्यात झाली आहे. गेल्या 50 दिवसांत राज्यात 40,000 नवीन ई-बाईक्सची नोंदणी झाली आहे. इतकेच नाही तर देशात ई-बाईक खरेदीत राज्य अव्वल ठरले आहे.

40 हजार नवीन खरेदी

ई-बाईक खरेदीत महाराष्ट्राने 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 50 दिवसांत 40 हजार ई-बाईकची विक्रमी नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक इलेक्ट्रिक बाइक्स असलेले राज्य ठरले आहे. संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बाईक्समध्ये 15% वाढीसह वाहतुकीसाठी स्वच्छ इंधनाकडे जाण्याचा कल वाढल्याचे दिसून येते. केवळ शहरीच नाही तर निमशहरी आणि ग्रामीण भागात पण ई-वाहनांचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. यावर आधारीत इको सिस्टिम उभी राहत आहे.

महाराष्ट्र अग्रेसर

राज्यात 3 लाख ई-बाईकची विक्रमी विक्री झाली आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्यातील जनतेने ई-बाईकला पसंती दिली आहे. कर्नाटक राज्यात 2.4 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आहेत आणि तामिळनाडूमध्ये 1.7 लाख ई-बाईक आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यभरातील इलेक्ट्रिक बाइक्समध्ये 15% वाढ झाली आहे.

अनेक स्टार्टअप्स मैदानात

ई-बाईक मार्केटला चालना मिळाल्याने अनेक स्टार्टअप्स मैदानात उतरले आहे. ई वाहन निर्मिती क्षेत्रात पुरक उद्योगांना पण चालना मिळाली. अनेक उद्योग त्यामुळे बहरले आहे. ई वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, बॅटरी, इतर स्पेअर पार्ट्स, तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ई-बाईकसह ई-कारची बाजारपेठ पण वाढत आहे. लवकरच देशात मोठ्या प्रमाणात ई-कारची निर्मिती होईल. कॉम्पॅक्ट कार निर्मितीत काही वाहन कंपन्या उतरल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाच्या बजेटमधील ई-वाहनांची संख्या वाढेल, तसा हा आकडा लक्षणीय असेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.