AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hybrid आणि Full Electric कारमध्ये नेमका फरक काय? कोणती बेस्ट? जाणून घ्या

तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या टाळू इच्छित असाल तर हायब्रीड कार हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण पर्यावरणाला प्राधान्य देऊन शहरात कमी अंतराचा प्रवास केल्यास इलेक्ट्रिक कार हा चांगला पर्याय ठरू शकतो. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Hybrid आणि Full Electric कारमध्ये नेमका फरक काय? कोणती बेस्ट? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Feb 05, 2025 | 7:46 PM
Share

आजच्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्री झपाट्याने बदलत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाच्या चिंतेमुळे इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारची मागणी वाढत आहे. या दोघांमधील फरकाबद्दल बरेच लोक संभ्रमात असतात. हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कारमधील मुख्य फरक आणि कोणती कार तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. जाणून घेऊया.

हायब्रीड कार

हायब्रीड कारमध्ये दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पेट्रोल किंवा डिझेल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर. ही दोन्ही इंजिने मिळून कार चालवण्यासाठी एकत्रित शक्ती प्रदान करतात. हायब्रीड कारची दोन प्रमुख श्रेणींमध्ये विभागणी करता येईल.

सौम्य हायब्रीड

या गाड्या पारंपरिक पेट्रोल/डिझेल कारसारख्याच आहेत, पण त्यात छोटी इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे जी मायलेज वाढवण्यास मदत करते. माइल्ड हायब्रीड कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये चालू शकत नाहीत.

मजबूत हायब्रीड

याला फुल हायब्रीड असेही म्हणतात. या कार ईव्ही मोडमध्येही धावू शकतात, म्हणजेच कमी वेगात त्या फक्त बॅटरीवर धावतात आणि जास्त वेगाने इंजिन वापरतात. या कार आपोआप पेट्रोल आणि इलेक्ट्रिक मोटर्समध्ये स्विच करू शकतात.

इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे बॅटरीवर अवलंबून असतात आणि त्यांना कोणतेही पारंपरिक इंजिन नसते. त्यांना चार्जिंग स्टेशन किंवा घरी बसवलेले चार्जर लावले जाते. या कारची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 200-500 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते. अमेरिका, युरोप आणि चीन सारख्या देशांमध्ये त्यांचा झपाट्याने विस्तार होत आहे, परंतु भारतात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही मर्यादित आहे.

कोणती कार सर्वोत्तम?

पर्यावरणासाठी: इलेक्ट्रिक कार अधिक पर्यावरणपूरक असतात कारण त्यांचे उत्सर्जन नसते.

फ्यूल इकॉनॉमी: हायब्रीड कार पेट्रोल/डिझेलवर चालतात, पण ईव्ही मोडच्या सोयीमुळे मायलेज चांगलं मिळतं.

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर : इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंग स्टेशनची गरज असते, जी सगळीकडे उपलब्ध नसते. अशा वेळी हायब्रीड कार अधिक सोयीस्कर ठरतात.

नेमकी कोणती कार घ्यावी?

सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाच्या चिंतेमुळे एक नवीन बदल होत आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारची मागणी वाढत आहे. ईव्ही मोडच्या सोयीमुळे मायलेज चांगलं मिळतं. त्यामुळे तुम्ही देखील विचार करूनच कार घ्यायला हवी. कारण, या गोष्टी नेहमी अपडेट होतात आणि बदलतातही. त्यामुळे एकदाच वस्तू घ्या पण ती तुम्हाला परवडली देखील पाहिजे आणि तुमच्या बजेटमध्ये देखील असली पाहिजे.

मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.