
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फ्रेब्रुवारीला देशाचा केंद्रीय सादर केला. यात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. खासकरून एआय, आधुनिक शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर भर देण्यात आला. त्याचबरोबर रेल्वे आणि दुर्मिळ खनिजांच्या बाबतीतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पावर क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सीएमडी डॉ. कैलाश काटकर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना, क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सीएमडी डॉ. कैलाश काटकर यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर सरकारने दिलेल्या लक्ष्याचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, “आम्ही भारत सरकारचे एका दूरदर्शी अर्थसंकल्पाबद्दल आभार मानतो, ज्यामध्ये एआय (AI) सह अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि आयटी व क्लाउड सेवांचा विस्तार, तसेच तळागाळातील उद्योजकतेवर जोरदार भर दिला आहे.
काटकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘आरोग्यसेवा, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआय-आधारित प्रणालींच्या वाढत्या वापरामुळे लाखो नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणाकर आहे. आरोग्यसेवा, कृषी (ॲग्रीस्टॅक) आणि शिक्षण प्रणालींमध्ये एआय-आधारित प्रणालींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे नागरिकांचा डिजिटल ठसा लक्षणीयरीत्या विस्तारतो, ज्यामुळे डेटा संरक्षण आणि ग्राहकांची सायबर लवचिकता अधिकाधिक महत्त्वपूर्ण ठरते.’
काटकर यांनी शाळांमधील एव्हीजीसी लॅब, पर्यटनासाठी राष्ट्रीय डिजिटल ज्ञान ग्रीड, वैद्यकीय मूल्य पर्यटन केंद्रे आणि मोठ्या प्रमाणावरील कौशल्य विकास कार्यक्रमांसारख्या उपक्रमांवरही प्रकाश टाकला. यावर बोलताना ते म्हणाले की, हे उपक्रम वैयक्तिक डेटा, डिजिटल ओळख यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व आणि आत्मनिर्भर स्वदेशी सायबर लवचिकतेची गरज अधोरेखित करतात.
सेक्राइटचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर म्हणाले की, अर्थसंकल्पातील डिजिटल प्रवेगवर दिलेल्या भरमुळे संस्था आणि नागरिक तंत्रज्ञानाशी ज्या प्रकारे संवाद साधतात, त्यात बदल होईल. आम्ही सेवा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर इकोसिस्टममध्ये डिजिटल प्रवेगावर सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करतो, ज्यामुळे उद्योग, संस्था आणि नागरिक डिजिटल प्रणालींशी ज्या प्रकारे जोडले जातात, त्यात लक्षणीय वाढ होईल.
पुढे बोलताना डॉ. संजय काटकर म्हणाले की, ‘क्लाउड सेवांसाठी कर सवलतींचा विस्तार, आयटी सेवांसाठी सेफ हार्बर फ्रेमवर्क आणि वित्त, लॉजिस्टिक्स, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमधील गुंतवणुकीमुळे एआय-आधारित प्लॅटफॉर्मचा व्यापक स्वीकार होईल. एआयसह ॲग्रीस्टॅकचे एकत्रीकरण, डिजिटल शिक्षण प्रणाली, वैद्यकीय मूल्य पर्यटन केंद्रे आणि मोठ्या प्रमाणावरील कौशल्य विकास कार्यक्रमांसारख्या उपक्रमांमुळे, सायबर लवचिकता या वाढीसाठी मूलभूत ठरते.
तसेच उद्योगाकडून मिळणारा मूळ संदेश स्पष्ट आहे. जसजसे भारताच्या डिजिटल महत्त्वाकांक्षा वाढत आहेत, तसतसे देशाचा डेटा आणि डिजिटल ओळख सुरक्षित करणे ही आता दुय्यम बाब राहिलेली नाही. तंत्रज्ञानाच्या वाढीच्या या पुढील टप्प्याचे मूल्यांकन कसे केले जाईल, याच्या केंद्रस्थानी ही बाब येत आहे असंही संजय काटकर यांनी म्हटले आहे.