AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांवर 121.6 कोटींचे कर्ज, विद्यार्थी कर्ज कसे फेडणार; केंद्र सरकारने स्पष्ट केली आपली भूमिका

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. (Russia-Ukraine crisis) रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जसा जागतिक आर्थव्यवस्थेला बसला आहे. तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक फटका हा युक्रेनमधून भारतात परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे.

युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांवर 121.6 कोटींचे कर्ज, विद्यार्थी कर्ज कसे फेडणार; केंद्र सरकारने स्पष्ट केली आपली भूमिका
युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांवर कर्जाचा डोंगर
| Updated on: Apr 05, 2022 | 2:44 PM
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. (Russia-Ukraine crisis) रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका जसा जागतिक आर्थव्यवस्थेला बसला आहे. तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक फटका हा युक्रेनमधून भारतात परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या जवळपास सर्वच भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशात आणण्यात यश आले आहे. मात्र या विद्यार्थ्यांसमोर सध्या एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे शैक्षणिक कर्जाची परतफेड कशी करायची? जे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेले होते, त्यांनी आपल्या शिक्षणासाठी लाखो रुपये कर्ज घेतले आहे. मात्र शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागल्याने हे शैक्षणिक लोन (Education Loan) आता परत कसे फेडायचे असा प्रश्न या विद्यार्थांना पडला आहे. याबाबत सरकारच्या वतीने संसदेत माहिती देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या एकूण 1319 विद्यार्थ्यांनी 121.6 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या विद्यार्थ्यांना 21 खासगी बँकांनी (BANK) कर्ज दिले आहे.

केंद्र सरकारची भूमिका

युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांवर एकूण 121.6 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या विद्यार्थ्यांना युद्धामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले आहे. या विद्यार्थ्यांकडे डिग्री नसल्यामुळे आता हे विद्यार्थी कर्ज कसे फेडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बोलताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, सध्या आम्ही युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आढावा घेत आहोत. रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमध्ये परिस्थिती कधी सामान्य होणार याबाबत निश्चित सांगता येणार नाही. मात्र लवकरच याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊ. काँग्रेस खासदार रवनीत सिंह यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली.

आतापर्यंत 22500 नागरिक भारतात परतले

याबाबत पुढे माहिती देताना केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीय नागरिक युक्रेनमध्ये आडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्राच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमंतर्गंत आतापर्यंत एकूण 22500 नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांना सरकारच्या वतीने शक्य तीतकी मदत पुरवण्यात येत असल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Russia Ukraine war : काय बोलता! युद्ध ठरलं वरदान, काही देशांची 8 वर्षांची मंदी संपली

मार्चच्या तिमाहीत देशात नऊ टक्क्यांनी वाढली घरांची विक्री, मुंबई-पुण्यात मात्र घट

Mukesh Ambani, Gautam Adani : अदानींनी एका झटक्यात कमावले 35 हजार कोटी, अंबानींनी कमावले 100 बिलियन डॉलर्स, नेमकं असं काय झालं?

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....