AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm वर कारवाईचा बडगा, आता तुमच्यावर काय होणार परिणाम

Paytm RBI Action | भारतीय फिनटेक कंपन्यांमध्ये पेटीएम हे मोठे नाव आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमला दणका दिला आहे. त्यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे. तर ग्राहकांना पण हा काय गोंधळ सुरु आहे. या कारवाईचा काय परिणाम होणार, त्यांचे खाते बंद होणार का, याबाबत संभ्रम आहे.

Paytm वर कारवाईचा बडगा, आता तुमच्यावर काय होणार परिणाम
| Updated on: Feb 02, 2024 | 9:28 AM
Share

नवी दिल्ली | 2 February 2024 : अवघ्या काही वर्षांपूर्वी भारतीय नागरिकांना विना रोख रक्कम किराणा अथवा इतर वस्तू खरेदी करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता. आता तर गल्लीत येणाऱ्या भाजीपाला, हर एक मालवाल्यापासून ते मोठ-मोठ्या हॉटेलपर्यंत युपीआयचा बोलबाला आहे. पण या कॅशलेस पॅकेटच्या सुरुवातीला Paytm ने भारतीय नागरिकांना डिजिटल व्यवहाराची गोडी लावली. One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 38,600 कोटी रुपये इतके आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम धडक कारवाई केल्याने कंपनीच्या मूल्यामध्ये 9,700 कोटी रुपयांची घसरण आली आहे.

पेटीएमवर ही बंदी

  • RBI ने पेटीएमवर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आहेत.
  • 29 फेब्रुवारीनंतर पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही
  • 11 मार्चनंतर ग्राहक जोडण्याची प्रक्रिया बंद होईल
  • ग्राहकांना सध्या बँकेतून रक्कम काढण्यास परवानगी आहे
  • पण बँकिंग सेवा अवघ्या महिना भरातच ठप्प होईल

2009 मध्ये घेतली होती Paytm ने एंट्री

उत्तर प्रदेशातील अलिगड येथील विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची सुरुवात झाली होती. ही कंपनी मोबाईल कंटेंट क्षेत्रात काम करत होती. विजय शर्मा यांनी कंपनीचे बिझनेस मॉडल बदलले. 2009 मध्ये Paytm ची सुरुवात केली. त्यानंतर डिजिटल युगात पेटीएमचे नाणे खणखणले.

ग्राहकांवर काय होईल परिणाम

  1. आरबीआयच्या या दणक्यानंतर पेटीएममधील गुंतवणूकदार आणि ग्राहक दोन्ही धास्तावले आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा यांनी या बंदीचा मोठा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. कंपनी आरबीआयच्या नियमांचे पालन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  2. शर्मा यांच्या मते, RBI ची बंदी ही केवळ पेटीएम पेमेंट्स बँक पुरतीच मर्यादीत आहे. त्याचा कंपनीच्या इतर सेवांवर परिणाम होणार नाही. ग्राहकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पेटीएम लवकरच एखाद्या बँकेसोबत हातमिळवणी करणार आहे. पेटीएमचे COO भावेश गुप्ता यांच्या मते, इक्विटी आणि विमा सेवांना बंदीचा फटका बसणार नाही.
  3. पण या ताज्या घडामोडींमुळे पेटीएमचे बाजारातील भांडवल कमालीचे घसरले आहे. पण पेटीएम संस्थापकांना या परिस्थितीतून लवकरच बाहेर पडण्याचे संकेत दिले. आता ग्राहक या 38,600 कोटी रुपये बाजार भांडवल असणाऱ्या कंपनीवर किती भरवसा ठेवतात, हे या महिन्यात समोर येईल.

Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी