AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?

सामन्यात अनेकदा मोठे वाद होतात. खेळाडू एकमेकांच्या अंगावर थेट धावून जातात, आता या प्रकरणावर माजी क्रिकेटपटूने एक मागणी केली आहे.

वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे...थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
| Updated on: Aug 26, 2026 | 12:49 PM
Share

IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे.  या सामन्यातील अगदी पहिल्याच दिवशी मैदानात जोरदार राडा झाला. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यशस्वी जयस्वाल आणि असिथ फर्नांडो यांच्यात प्रचंग वाद झाला. आता या वादानंतर आयसीसीने मोठी कारावाई सुद्धा केली. आता यानंतर माजी फलंदाजाने एक भलतीच मागणी केली आहे.

वैभव सूर्यवंशी सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून खेळत आहे. आता या दोन खेळाडूंबाबत आयसीसी आणि बीसीसीआयकडे एक जोरदार आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी केले आहे. संजय मांजरेकर यांनी आयसीसी आणि बीसीसीआयला सांगितले की, त्यांना शिक्षा न देऊन त्यांना बिघडवले जात आहे. त्यांना त्याच चुका पुन्हा करण्याची सवय लावली जात आहे. हे खेळासाठी चांगले लक्षण नाही.

संजय मांजरेकर यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवरून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्याबाबत आयसीसी आणि बीसीसीआयकडे आवाहन केले. त्यांनी लिहिले, “आयसीसी आणि बीसीसीआय, अलीकडेच इंडिया ‘ए’ संघाकडून खेळणारा वैभव आणि आता जयस्वाल, जर तुम्ही त्यांना गैरवर्तनाबद्दल शिक्षा न देता असेच सोडून देत राहिलात, तर तुम्ही त्यांना तेच वर्तन पुन्हा करण्याची सवय लावत आहात. हे खेळासाठी आणि विशेषतः त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी चांगले नाही.”

हसंजय मांजरेकर यांचे अपील वैभव आणि यशस्वीच्या अलीकडील गैरवर्तनाशी संबंधित आहे. कोलंबो येथील दुसऱ्या कसोटीदरम्यान यशस्वी जैस्वालचा श्रीलंकन ​​गोलंदाज असिथा फर्नांडोसोबत वाद झाला होता, ज्यामुळे केवळ वादच निर्माण झाला नाही, तर त्याच्या कृतीबद्दल यशस्वीवर टीकाही झाली. यशस्वी जैस्वालला फक्त त्याच्या सामन्याच्या मानधनाचा दंड ठोठावण्यात आला.

याचप्रमाणे, भारत ‘अ’ संघाच्या सामन्यादरम्यान, वैभव सूर्यवंशीचा श्रीलंका ‘अ’ संघाचा खेळाडू विशन हलंबगेसोबत वाद झाला होता. वैभव सूर्यवंशीच्या वागणुकीमुळे, या १५ वर्षीय खेळाडूवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतीय मंडळाचा कोणताही सहभाग नाही.

Follow Us
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी