AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI Hub : भारत होणार AI हब! रिलायन्सनंतर टाटा समूहासोबत या कंपनीचा वायदा

AI Hub : जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनीने भारतातील दोन मोठ्या उद्योग समूहासोबत हातमिळवणी केल्याचे जाहीर केले. यामध्ये टाटा समूह आणि रिलायन्स समूहाचा समावेश आहे. भारतात कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञान(AI) हब तयार करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

AI Hub : भारत होणार AI हब! रिलायन्सनंतर टाटा समूहासोबत या कंपनीचा वायदा
| Updated on: Sep 09, 2023 | 9:29 AM
Share

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : जगात सध्या कृत्रिम बुद्धिमतेचा (AI Technology) बोलबाला सुरु आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती सतावत आहेत तर या तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत झटपट काम उरकेल. मनुष्यबळ कमी लागेल असे काही दावे करण्यात येत आहे. भारत लवकरच एआय हब होण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) आणि टाटा समूहासोबत (Tata Group) त्यांनी सहकार्य कराराची घोषणा केली. शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी याविषयीची माहिती देण्यात आली. या नव्या घडामोडींमुळे देशातील उदयोन्मुख पिढीला मोठा फायदा होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. तर काहींना हे तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात मनुष्याचे काम हिसकावून घेईल अशी भीती वाटत आहे.

NVIDIA आणणार क्रांती

NVIDIA Inks ही कंपनी भारतात या आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी करणार आहे. त्यासाठी रिलायन्स समूह आणि टाटा समूहाशी हातमिळवणी करण्यात आली आहे. बाजारात चीनला शह देण्यासाठी भारताला विकासाच्या वाटेने जाणे क्रमप्राप्त आहे. चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनासाठी भरीव प्रयत्न करण्यात येत आहे. आता एआय तंत्रज्ञानासाठी जमीन कसण्यात येत आहे. रिलायन्स कंपनी त्यांच्या फाऊंडेशन लार्ज लँग्वेज मॉडलसाठी(LLM) काम करत आहे. देशातील विविध भाषांमध्ये सहज संवाद साधता यावा, सहज आणि योग्य भाषांतर व्हावे यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी AI टूल्स आणण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. NVIDIA Inks त्यासाठी खास मदत करणार आहे. (Latest News Marathi)

सुपर कम्प्युटरला टाकेल मागे

दोन्ही कंपन्या एआय पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर देणार आहे. त्यामाध्यमातून रिलायन्स आणि Nvidia Inks भारतातील सुपर कम्युटरला पण मागे टाकेल. त्यापेक्षा अधिक वेगाने हे तंत्रज्ञान काम करेल. सध्या रिलायन्स AI इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम युनिट, रिलायन्स जिओ इन्फोकॉमसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

कंपनीकडे 3800 कर्मचारी

NVIDIA Inks ने 2004 साली भारतात व्यवसाय थाटला. या कंपनीकडे अनेक क्लाएंट आहेत. या कंपनीचे देशात 4 इंजिनिअरिंग सेंटर आहेत. यामध्ये गुरुग्राम, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरु यांचा समावेश आहे. या सेंटरमध्ये सध्या 3800 कर्मचारी काम करत आहेत. भीती नको

कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence-AI) सध्या जोरदार चर्चेत आहे. हॉलिवूडमधील लेखक आणि कलाकार त्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर अनेकांना नोकऱ्या जाण्याचा धोका सतावत आहे. काहीं सरकारांना माहितीचा गैरवापर वाढण्याची भीती सतावत आहे. संगणक, कम्प्युटर आले तेव्हा पण अशीच धास्ती होती. भीती होती, पण त्याचा मोठा तोटा झाला नाही. तसाच एआयचा पण बाऊ करण्याची गरज नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.