नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2019-20 च्या अर्थसंकल्पात कर सवलतीची घोषणा केली आहे. यानुसार केवळ 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्नच करमुक्त घोषित करण्यात आले आहे. 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. मात्र, ही सूट मागील अर्थसंकल्पा इतकीच आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला कोणतीही मोठी कर सवलत देण्यात आलेली नाही.