AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार

FM Nirmala Sitharaman Speech on Budget 2024 | भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्याकडे वाटचाल सुरु आहे. गरीब, महिला, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी योजना तयार केल्या गेल्या आहेत.

Budget 2024 | भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार
nirmala sitharaman
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 01, 2024 | 12:07 PM
Share

नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? याची माहिती दिली. त्यासाठी कोणकोणत्या विभागात काम करणार आहे, हे सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पहिल्या 5 मध्ये आली आहे. आता येत्या काळात पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत भारत येणार आहे. तसेच 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात येणार आहे.

सरकार याला देणार प्राधान्य

भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्याकडे वाटचाल सुरु आहे. गरीब, महिला, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी योजना तयार केल्या गेल्या आहेत. मागील दहा वर्षांत 25 कोटी नागरिक गरीबी रेषेमधून बाहेर आले आहे.

अर्थमंत्र्यांच्या भाषणात महत्वाचे मुद्दे

  • 78 लाख लोकांना पीएम स्वानिधी योजनेचा लाभ
  • 10 वर्षात 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत.
  • सरकार जीडीपीकडे लक्ष देत असून त्याचा परिणाम दिसून येत आहे.
  • मुद्रा योजनेंतर्गत महिलांना 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.
  • पीएम आवास अंतर्गत 70 टक्क्यांहून अधिक घरे महिलांना दिली जात आहेत.
  • सर्वसामान्यांचे सरासरी उत्पन्न 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षात ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत.
  • 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
  • एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या.
  • विमानतळाची संख्या दुपट्टीने वाढवली
  • ५१७ नवीन विमान मार्गांचा प्रस्ताव
  • ४० हजार रेल्वे कोच वंदे भारतमध्ये बदलणार
  • रक्षा विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
  • ९ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणावर भर
  • दहा वर्षांत १४९ नवीन विमानतळे बनवली
  • पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भर, नवीन रोजगार निर्माण होणार
  • एक कोटी घरांना सौर उर्जा देण्याचा प्रयत्न

Follow Us
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच