AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार

FM Nirmala Sitharaman Speech on Budget 2024 | भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्याकडे वाटचाल सुरु आहे. गरीब, महिला, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी योजना तयार केल्या गेल्या आहेत.

Budget 2024 | भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार
nirmala sitharaman
| Updated on: Feb 01, 2024 | 12:07 PM
Share

नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? याची माहिती दिली. त्यासाठी कोणकोणत्या विभागात काम करणार आहे, हे सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पहिल्या 5 मध्ये आली आहे. आता येत्या काळात पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत भारत येणार आहे. तसेच 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात येणार आहे.

सरकार याला देणार प्राधान्य

भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्याकडे वाटचाल सुरु आहे. गरीब, महिला, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी योजना तयार केल्या गेल्या आहेत. मागील दहा वर्षांत 25 कोटी नागरिक गरीबी रेषेमधून बाहेर आले आहे.

अर्थमंत्र्यांच्या भाषणात महत्वाचे मुद्दे

  • 78 लाख लोकांना पीएम स्वानिधी योजनेचा लाभ
  • 10 वर्षात 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत.
  • सरकार जीडीपीकडे लक्ष देत असून त्याचा परिणाम दिसून येत आहे.
  • मुद्रा योजनेंतर्गत महिलांना 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.
  • पीएम आवास अंतर्गत 70 टक्क्यांहून अधिक घरे महिलांना दिली जात आहेत.
  • सर्वसामान्यांचे सरासरी उत्पन्न 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षात ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत.
  • 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
  • एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या.
  • विमानतळाची संख्या दुपट्टीने वाढवली
  • ५१७ नवीन विमान मार्गांचा प्रस्ताव
  • ४० हजार रेल्वे कोच वंदे भारतमध्ये बदलणार
  • रक्षा विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
  • ९ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणावर भर
  • दहा वर्षांत १४९ नवीन विमानतळे बनवली
  • पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भर, नवीन रोजगार निर्माण होणार
  • एक कोटी घरांना सौर उर्जा देण्याचा प्रयत्न

Follow Us
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?.
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,.
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?.
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर.
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण.
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट.
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप.
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा....
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा.....
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं..
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं...