AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | 1950 मध्ये किती होता आयकर, तुम्हाला माहिती आहे का?

Budget 2024 | गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये नवीन कर व्यवस्थेतंर्गत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. तर जुन्या कर व्यवस्थेत अशाप्रकारचा मोठा बदल करण्यात आलेला नाही. करासंबंधी कोणतेही निश्चित नियम नाहीत. यामध्ये सरकार वेळोवेळी बदल करते.

Budget 2024 | 1950 मध्ये किती होता आयकर, तुम्हाला माहिती आहे का?
| Updated on: Jan 28, 2024 | 9:51 AM
Share

नवी दिल्ली | 28 January 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अंतरिम बजेट सादर करतील. पूर्ण बजेट सरकारच्या स्थापनेनंतर जुलै महिन्यात सादर होईल. बजेटपूर्वी सर्वाधिक चर्चा नोकरदार वर्गाची असते. त्यांना कर रचनेत बदल हवा असतो. महागाईने हा वर्ग सध्या बेजार झाला आहे. त्यांना मोठी कर सवलत हवी आहे. त्यांना कराची मर्यादा वाढवून हवी आहे. पगारदार वर्ग टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची मागणी करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की 1950 मध्ये किती आयकर भरावा लागत होता आणि कधीपासून कर घेण्यात येतो ते?

  1. यंदाच्या बजेटमध्ये मोठी घोषणा – गेल्यावर्षी अर्थमंत्र्यांनी नवीन कर व्यवस्थेत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त केले होते. तर जुन्या कर व्यवस्थेत असा कोणताही बदल करण्यात आला नव्हता. करासंबंधी असे निश्चित नियम नाही. सरकार त्यात वेळोवेळी बदल करते. स्वातंत्र्यानंतर आयकरासंबंधी अनेक बदल पाहायला मिळाले. या बजेटमध्ये नवीन कर प्रणालीत 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर जुन्या कर रचनेतही मोठ्या बदलाची अपेक्षा आहे.
  2. 1949-50 मध्ये किती होता आयकर – स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा 1949-50 च्या बजेटमध्ये आयकर निश्चित करण्यात आला. त्यापू्र्वी 10 हजारांच्या उत्पन्नावर सर्वसामान्य नागरिकांना 4 पैसे टॅक्स द्यावा लागत होता. त्यानंतर तो कमी करण्यात आला . 10 हजारांच्या उत्पन्नावर 3 पैसे कर निश्चित करण्यात आला. तर 10 हजारांपेक्षा अधिकची कमाईवर 1.9 आना कर द्यावा लागत होता.
  3. 1500 रुपयांचे उत्पन्न होते करमुक्त – 1949-50 च्या बजेटमध्ये आयकर निश्चित करण्यात आला. 1,500 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले. या अर्थसंकल्पात 1,501 रुपये से 5,000 रुपये उत्पन्नावर 4.69 टक्के कर आकारण्याचे धोरण होते. तर 5,001 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10.94 टक्के कर आकारण्यात येत होता.
  4. 31.25 टक्के आयकर – त्यावेळी 10,001 ते 15,000 रुपयांच्या कमाईवर 21.88 टक्के आयकर द्यावा लागत होता. 15,001 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला 31.25 टक्के आयकर द्यावा लागत होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी करासंबंधीचे नियम बदलत गेले. आता जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था आहे. कदाचित लवकरच नवीन कर व्यवस्था जुन्या कर व्यवस्थेची जागा घेईल.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...