AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | बजेटमध्ये कुठे काय झाले स्वस्त-महाग; पण खिसा असा रिकामा झाला एका वर्षात

Budget 2024 | गेल्या एका वर्षात महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडला. अन्नधान्यापासून ते अनेक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सामान्य नागरिक मेटाकूटीला आला आहे. गेल्या बजेटपासून ते आताच्या बजेटपर्यंत काय बदल झाला. त्याचा नागरिकांच्या खिशावर काय परिणाम झाला?

Budget 2024 | बजेटमध्ये कुठे काय झाले स्वस्त-महाग; पण खिसा असा रिकामा झाला एका वर्षात
| Updated on: Feb 02, 2024 | 10:20 AM
Share

नवी दिल्ली | 2 February 2024 : GST आल्यापासून बजेटमध्ये स्वस्त आणि महाग अशा वर्गीकरणातील वस्तू बोटावर मोजण्याइतक्याच राहिल्या आहेत. आता केवळ त्याच वस्तूंच्या भावावर थेट परिणाम होतो, ज्यांचा संबंध उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क यांच्याशी येतो. या अंतरिम बजेटमध्ये सरकारने कोणत्याही शुल्कात काहीच बदल केलेला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात कोणतीची वस्तू स्वस्त झाली नाही. पण एका वर्षात महागाईचा परिणाम दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात दिसून आला. अन्नधान्य आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दूध, साखर, टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीत एका वर्षात मोठी वाढ झाली.

अन्नधान्याच्या अशा वाढल्या किंमती

  • तूरडाळ एका वर्षात 110 रुपयांहून 150 रुपयांच्या घरात
  • तांदूळ एका वर्षात 37 रुपयांहून 45 रुपये अथवा त्यापेक्षा जास्त
  • दूधाची किंमत 52 रुपयांहून 59 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक
  • साखरेचा भाव 40 रुपयांहून 44 रुपये
  • इतर अनेक वस्तूंचे भाव पण गगनाला भिडले आहेत
  • प्रत्येक शहरात आणि वस्तूच्या प्रतिनूसार किंमतीत बदल दिसतो

महागाईचा परिणाम काय

  1. भाजीपाल्याच्या किंमतीत 2023 मध्ये खूप चढउतार दिसला. गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात टोमॅटोच्या किंमती 250-300 रुपयांच्या घरात पोहचल्या. आयात धोरणात बदल केल्याने या किंमती घसरल्या. कांद्याच्या किंमतीत पण याच काळात मोठी वाढ होत असताना सरकारच्या हस्तक्षेपानंतर किंमती घसरल्या. पण मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाईच्या झळा बसल्या आहेत.
  2. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एका वर्षात वाढ दिसलेली नाही. पण किंमती वाढल्यापासून त्यात कपात झालेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारने त्यावरील कराचे ओझे कमी केले, तेवढाच काय तो दिलासा मिळालेला आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त असतानाही त्याचा दिलासा वाहनधारकांना मिळालेला नाही. या महागाईत मध्यमवर्ग सर्वाधिक होरपळला गेला आहे. वाढलेला ईएमआय, कोलमडलेले बजेट यामुळे त्यांना फटका बसला आहे.
  3. सोने-चांदीत वाढ झाल्याने खरेदीदार हिरमुसले आहे तर गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. 1 जानेवारी 2023 रोजी सोन्याची किंमत 54,867 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. आता हा भाव 62 हजार रुपयांच्या घरात पोहचला आहे. तर चांदी 69 हजारांवरुन 72 हजार रुपये किलोवर पोहचली आहे.
  4. आरबीआयने गेल्या एप्रिल 2023 पासून रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. ही ग्राहकांसाठी तात्पुरती मलम पट्टी ठरील आहे. कारण ग्राहकांना अगोदरच वाढीव व्याजदराने ईएमआय भरावा लागत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5 टक्के होता. तेव्हापासून रेपो दरात बदल झालेला नाही. रेपो दरात कपात न झाल्याने व्याजदर वाढला आहे. त्याचा फटका बसला आहे.

Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी