AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जात बुडालेल्या Vi चे MTNL-BSNL मध्ये विलीनीकरण होणार, सरकारची योजना काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी Vi चे सरकारी संचालित कंपन्यांमध्ये विलीनीकरणाचे कोणतेही प्रस्ताव केंद्र सरळ नाकारू शकते. ज्यांचा व्यवसायाचा रेकॉर्ड खराब आहे, त्यांनी आधी कर्जातून बाहेर पडण्याची गरज आहे, असंही सरकारचं म्हणणं असल्याची चर्चा आहे.

कर्जात बुडालेल्या Vi चे MTNL-BSNL मध्ये विलीनीकरण होणार, सरकारची योजना काय?
Vodafone-Idea
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 3:33 PM
Share

नवी दिल्लीः आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या व्होडाफोन आयडियासाठी एक वाईट बातमी आहे. व्होडाफोन आयडियाचे MTNL-BSNLमध्ये विलीनीकरण करण्याच्या विरोधात सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी Vi चे सरकारी संचालित कंपन्यांमध्ये विलीनीकरणाचे कोणतेही प्रस्ताव केंद्र सरळ नाकारू शकते. ज्यांचा व्यवसायाचा रेकॉर्ड खराब आहे, त्यांनी आधी कर्जातून बाहेर पडण्याची गरज आहे, असंही सरकारचं म्हणणं असल्याची चर्चा आहे.

आम्ही याला परवानगी कशी देऊ शकतो

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने TOI ला सांगितले की, आम्ही याला परवानगी कशी देऊ शकतो. हे जवळजवळ नफ्याचे खासगीकरण आणि तोट्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यासारखे आहे. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक कायदेशीर समस्यांमुळे VI चे MTNL आणि BSNL मध्ये विलीनीकरण कठीण झालेय.

बिर्ला यांची आपला हिस्सा सरकारला देण्याची ऑफर होती

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) मधील आपला हिस्सा सरकार किंवा अशा कोणत्याही संस्थेला देण्याची ऑफर दिली होती. बिर्ला यांनी 7 जून रोजी हे पत्र लिहिले. ते म्हणाले की, जुलैपर्यंत या तीन मुद्द्यांवर सरकारकडून तत्काळ सक्रिय सहकार्याच्या अनुपस्थितीत, VIL ची आर्थिक स्थिती बुडण्याच्या मार्गावर पोहोचेल, जे हाताळणे कठीण होईल. बिर्ला म्हणाले होते की, VIL शी संबंधित 27 कोटी भारतीयांप्रति आमचे कर्तव्य आहे. हे पाहता मी कंपनीतील माझे भाग सरकारला किंवा अशा कोणत्याही घटकाला सरकारच्या स्वाधीन करण्यास तयार आहे, जे कंपनीचे कामकाज चालू ठेवण्यास सक्षम आहे.

कंपनीवर 1.80 लाख कोटींचे कर्ज

व्होडाफोन आयडियावर सध्या 1.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि मार्च तिमाहीत 7,000 कोटींच्या तोट्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनुसार, त्यांच्यावर 1.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज चुकवण्याची तारीख जवळ येत आहे, तर निधीची उपलब्धता हे एक आव्हान आहे.

अशा प्रकारे एकूण 1.8 लाख कोटी रुपयांची थकबाकी

व्होडाफोन आयडियावर बँकांचे 23,000 कोटी रुपये, 61,000 कोटी रुपयांची AGR थकबाकी आणि 96,3000 कोटी रुपयांची स्पेक्ट्रम पेमेंट थकीत आहे. अशा प्रकारे एकूण 1.8 लाख कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय बँक हमी आणि स्पेक्ट्रम आणि AGR अनेक हजार कोटींची थकबाकी आणि बँक कर्जाचे व्याज भरणे बाकी आहे.

म्हणून बिर्ला यांनी अध्यक्षपद सोडले

कंपनीने सरकारला विनंती केल्यानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि थेट पदाचा राजीनामा दिला. व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाने नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हिमांशू कापनिया यांची नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नियुक्ती केली.

संबंधित बातम्या

तुम्ही नोकरी करत असल्यास हा फॉर्म लवकर भरा, अन्यथा 7 लाखांना मुकणार

तुम्ही कर्जाची परतफेड केलीय, मग हा कागद बँकेतून नक्की घ्या, अन्यथा…

Debt-ridden Vi will be merged into MTNL-BSNL, what is the government’s plan?

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.