AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक, कोण आहेत राधाकृष्ण दमानी?

राकेश झुनझुनवाला हे स्वतः राधाकृष्ण दमाणी यांच्याकडून गुंतवणुकीच्या टिप्स शिकलेत. डीमार्ट जवळपास सगळ्यांना माहीत असेल, त्याच डीमार्टचं साम्राज्य हे राधाकृष्ण दमाणींनी मोठ्या कष्टानं उभं केलंय.

D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक, कोण आहेत राधाकृष्ण दमानी?
radhakrush damani
Vaibhav Desai
Vaibhav Desai | Updated on: Aug 11, 2021 | 10:53 AM
Share

नवी दिल्लीः शेअर बाजारानं अनेकांना रातोरात श्रीमंत केलंय, तर काहींना रसातळालाही नेलंय. बरेच लोक शेअर बाजारातील तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांना आपला आदर्श मानतात. तसेच अनेक जण राकेश झुझुनवालांकडून गुंतवणुकीच्या टिप्सही घेतात. पण राकेश झुनझुनवाला हे स्वतः राधाकृष्ण दमाणी यांच्याकडून गुंतवणुकीच्या टिप्स शिकलेत. डीमार्ट जवळपास सगळ्यांना माहीत असेल, त्याच डीमार्टचं साम्राज्य हे राधाकृष्ण दमाणींनी मोठ्या कष्टानं उभं केलंय.

राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक

1954 मध्ये बिकानेर राजस्थान येथे जन्मलेले राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक आहेत. बिझनेस लीडर आणि स्टॉक एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण दमानी यांनी प्रत्यक्षात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले नाही. जर आपण गेल्या वर्षी जुलैबद्दल बोललो तर तेव्हा त्यांचे नेटवर्थ त्यावेळी 14 अब्ज डॉलर होते.

दमानी यांनी Avenue Supermart नावाची कंपनी सुरू केली

पहिल्यांदा राधाकृष्ण दमानी यांनी Avenue Supermart नावाची कंपनी सुरू केली. राधाकृष्ण दमानी शेअर बाजारातील एक ज्येष्ठ तज्ज्ञ, RD या नावाने ओळखले जातात. त्यांनी युनायटेड ब्रेवरीज, व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये भागीदारी खरेदी केलीय. त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये रॅडिसन ब्लू रिसॉर्ट मुंबईचा समावेश आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर बनले ब्रोकर

राधाकृष्ण दमानी मुंबईत एका चाळीतल्या खोलीत मोठे झाले. त्यांनी मुंबईतील कॉलेजमधून कॉमर्सचे शिक्षण घेतले, परंतु आरडींनी पहिल्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतरच शिक्षण सोडले. वयाच्या 32 व्या वर्षी आर. के. दमानी यांचे वडील वारले आणि ते त्यांच्या भावाच्या स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात सामील झाले.

दमानींनी नेमका कसला व्यवसाय केला?

राधाकृष्ण दमानी यांनी प्रथम बॉल बेअरिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी काही काळानंतर ही कंपनी बंद केली. 1989 मध्ये आर. के. दमानी यांनी ब्राईटस्टार ही गुंतवणूक कंपनी सुरू केली. 1992 मध्ये दमानी सेबी नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर बनले. यानंतर दमानी यांनी ब्रोकरेज व्यवसायात बरीच प्रगती केली. मल्टिबॅगर स्टॉकच्या सुरुवातीच्या ओळखीसाठी ते प्रसिद्ध झाले. राधाकृष्ण दमानी हे उच्च दर्जाचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि योग्य किमतीत त्यांचे शेअर्स खरेदी करून नफा कमावण्याच्या त्यांच्या रणनीतीसाठी प्रसिद्ध आहेत.

हर्षद मेहतांच्या काळात उचलला फायदा

राधाकृष्ण दमानी दलाल स्ट्रीटमध्ये आरडी म्हणून प्रसिद्ध होते, प्रसिद्ध शेअर गुंतवणूकदार चंद्रकांत संपत यांच्याकडून ते प्रभावित झाले. हर्षद मेहता यांच्या काळात दमानींनी शेअर बाजारातून वेगाने नफा मिळवण्यात मोठे यश मिळवले.

डी मार्टची केली स्थापना

राधाकृष्ण दमानी यांनी सुपरमार्केट रिटेल चेन डी-मार्टची सुरुवात केली. डी-मार्टचे पहिले स्टोअर 2002 मध्ये उघडण्यात आले. DMart चे लक्ष्य ग्राहकांना परवडणारे सामान पुरवणे आहे. गेल्या 15 वर्षात राधाकृष्ण दमानी यांनी सुपरमार्केट चेनला सर्वात फायदेशीर अन्न आणि किराणा किरकोळ विक्रेता बनवलेय. देशभरात त्यांची 200 हून अधिक दुकाने आहेत. वर्ष 2017 मध्ये डी-मार्ट शेअर बाजारात सूचीबद्ध केले गेलेय आणि ते 102%च्या प्रीमियमवर सूचीबद्ध झाले.

किरकोळ व्यवसायात रिलायन्स आणि बिर्लासारख्या मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले

विशेष म्हणजे राधाकृष्ण दमानी हे देशातील 20 श्रीमंतांपैकी एक आहेत. तसेच त्यांना जास्त लाईमलाईटचे जीवनही आवडत नाही. त्यांचा फक्त कामावर विश्वास आहे. राधाकृष्ण दमानी हे डी-मार्ट कंपनीचे मालक आहेत, ज्यांनी किरकोळ व्यवसायात रिलायन्स आणि बिर्लासारख्या मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकलेय.

कुठलेही स्टोअर भाडेतत्त्वावर नाही

डी-मार्टने आपल्या स्टोअरसाठी कधीही जागा भाड्याने घेतली नाही. जेव्हाही स्टोअर उघडले, त्यासाठी त्यांनी स्वतःची जागा खरेदी केली. त्यामुळे त्यांच्या नफ्याचा मोठा भाग जो भाड्याने गेला असता तो वाचला. तसेच त्यातून कंपनीला मोठा फायदा मिळाला आणि आपल्या स्टोअरमध्ये ते कमी किमतीत माल विकू लागले.

कोणत्याही मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा मॉलमध्ये स्टोअर नाही

मोठ्या मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्टोअर खरेदी करणे डी-मार्टसाठी मोठी गोष्ट नव्हती. परंतु राधाकृष्ण दमानी यांना मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे चाल करायची नव्हती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या अटींवर व्यवसाय चालवण्याचा निर्धार केला आणि मोठ्या मॉलमध्ये कधीही दुकान उघडली नाहीत. याचे दोन फायदे होते. प्रथम कंपनीची प्रचंड भाड्यातून सुटका झाली आणि दुसरे म्हणजे मॉलमध्ये स्टोअर उघडणाऱ्यांना देखभाल खर्च देखील भरावा लागतो, हा खर्च कंपनीने वाचवला. ज्याचा थेट परिणाम स्टोअरमधील वस्तूंच्या किमतीवर झाला.

मध्यम उत्पन्न गटातील लोकांना केंद्रस्थानी ठेवून स्टोअर्स उघडली

मध्यम उत्पन्न गटातील लोकांना डोळ्यांसमोर ठेवून त्या परिसरात त्यांनी दुकाने उघडली. ज्यांना पैशाचं मूल्य कळते, ज्यांना कमी किमतीत मालाची गरज आहे. अशा लोकांना लक्ष्य करून स्टोअर उभारण्यात आली.

संबंधित बातम्या

Success Story: अवघ्या 99 रुपयांत पँट विकणाऱ्या किशोर बियाणींनी 9000 कोटीचे पँटालून कसे बनवले? वाचा सविस्तर

कोरोना लढाईत 1125 कोटी देणारे आणि विप्रोला सर्वोच्च स्थानी नेणारे अजीम प्रेमजी नेमके कोण?, वाचा सविस्तर

Do you know Radhakrishna Damani, who raised D-Mart retail company

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली