AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांना झटका! खायच्या तेलापासून ते दुधापर्यंत ‘या’ गोष्टी महागल्या

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 पर्यंत खाद्य तेलाच्या किंमती 47 टक्क्यांनी, डाळींच्या किंमती 17 टक्क्यांनी आणि खुल्या चहाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सर्वसामान्यांना झटका! खायच्या तेलापासून ते दुधापर्यंत 'या' गोष्टी महागल्या
| Edited By: | Updated on: Apr 03, 2021 | 2:33 PM
Share

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडे मोडलं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडत आहे. तांदूळ, मसूर, पीठ, मोहरीचे तेल, खाद्यतेल किंमत किंवा चहा आणि मीठाचे भाव एका वर्षात इतके वाढले आहेत की स्वयंपाकघरचे बजेट गोंधळलेले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 पर्यंत खाद्य तेलाच्या किंमती 47 टक्क्यांनी, डाळींच्या किंमती 17 टक्क्यांनी आणि खुल्या चहाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, भात दर 14.65 टक्के, गव्हाचे पीठ 3.26 टक्क्यांनी वाढले आहेत. अशात साखर स्वस्त झाली आहे. (edible oil to milk and salt became expensive here is all details)

किती वाढले खाद्य तेलांचे दर ?

अहवालानुसार, खाद्यतेलांच्या किंमती गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पॅक पाम तेलाची किंमत 87 रुपयांवरून 121 रुपयांवर, सूर्यफूल तेल 106 ते 157, भाजीपाला तेल 88 ते 121 आणि मोहरीचे तेल (पॅक) प्रतिलिटर 117 ते 151 रुपयांवर पोहोचले आहे. तिथेच शेंगदाणे 139 ते 165 आणि सोया तेल 99 ते 133 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचलं आहे.

चहा आणि दुधाचा नवीन दर

खाद्य तेलाव्यतिरिक्त चहा आणि दुधाच्या किंमतीही वाढल्या आहेत. एका वर्षात ओपन चहा 217 ते 281 किलोपर्यंत पोहोचला आहे. चहाच्या दरात एकूण 29 टक्के वाढ झाली आहे. या एका वर्षात मीठाच्या भावातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी दूध 7 टक्क्यांनी महाग झाले आहे. ग्राहक मंत्रालयाला दिलेली ही आकडेवारी देशभरातील 135 खुदरों केंद्रांपैकी 111 केंद्रांकडून गोळा केली गेली आहे.

किती महाग आहेत डाळी ?

ताज्या आकडेवारीनुसार तूर डाळींचे डाळ 91 रुपये ते 106 रुपये, उडीद डाळ 99 ते 109 रुपये, मसूर डाळ 68 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे. मूग डाळही 103 ते 105 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. (edible oil to milk and salt became expensive here is all details)

संबंधित बातम्या – 

घरी बसल्या 3 लाख कराल कमाई, आताच सुरू करा ‘हा’ धमाकेदार व्यवसाय

LPG Cylinder : सिलेंडर बुक करणं झालं सोपं, आता ‘या’ नंबरवर मिस कॉल द्या आणि…

मोठी बातमी! आता Post Office मधून पैसे काढणं महागणार, 1 एप्रिलपासून नवा नियम लागू

(edible oil to milk and salt became expensive here is all details)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक