AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न भोवला, इतके हजार कोटी रुपये घेतले काढून, भारतीयांनी तारला शेअर बाजार

FPI : परेदशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराला हात दाखवला.

FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न भोवला, इतके हजार कोटी रुपये घेतले काढून, भारतीयांनी तारला शेअर बाजार
| Updated on: Jan 08, 2023 | 7:35 PM
Share

नवी दिल्ली : परदेशी गुंतवणूकदारांची (Foreign Investors) भीतीने गाळण उडाल्याने त्यांनी भारतीय शेअर बाजारातून (Share Market) पलायन केले. सध्या चीनसह जगातील काही देशांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. तर अमेरिकन बाजाराला मंदीचा धोका सतावत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे धास्तावलेल्या परदेशी पाहुण्यांनी लागोलाग बाजारातून पलायन सुरु केले. त्यांनी गुंतवणूक काढून घेतली. अर्थात शेअर बाजाराला त्याचा फटका बसला. पण भारतीय गुंतवणूकदारांनी (Indian Investors) बाजाराचे पानीपत होऊ दिले नाही. त्यांनी बाजाराला तारले.

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी बाजारातून (Indian Equity Market) पलायन केले. त्यांनी जवळपास 5,900 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी हा प्रताप केला. अर्थात या कृतीमागे भीती आहे.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय इक्विटी बाजाराविषयी सतर्क झाले आहे. कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे इक्विटी रिसर्च प्रमुख श्रीकांत चौहान यांनी या घडामोडींवर मत मांडले. त्यांनी यामागची कारणं विषद केली.

चौहान यांच्या मते, येत्या काही दिवसात भारतीय सकल राष्ट्रीय उत्पादनाविषयीची (GDP) चिंता, केंद्रीय बँकेचे धोरण, व्याजदरातील वृद्धी आणि तिसऱ्या तिमाहीतील कमाई होण्याचे संकेत, या दरम्यान परदेशी पाहुण्यांचे अस्थिरतेचे धोरण कायम राहणार आहे.

डिपॉजिटरीच्या आकड्यानुसार, FPI ने नवीन वर्षात शेअर बाजाराकडे पाठ फिरवली. 2-6 जानेवारी दरम्यान त्यांनी शेअर बाजारातून 5,872 कोटी रुपये काढले.  गेल्या 11 दिवसांपासून विक्री करत आहे. त्यामुळे एकत्रित विक्री 14,300 कोटी रुपयांवर पोहचली आहे.

आकड्यांवर नजर टाकता, परदेशी पाहुण्यांनी सरत्या वर्षात 2022 मध्ये भारतीय इक्विटी मार्केटमधून 1.21 लाख कोटी रुपये काढले. तर डिसेंबरमध्ये 11,119 कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये 36,239 कोटी रुपये बाजारात ओतले होते. त्यानंतर आता ते पलायन करत आहेत.

जगभरातील केंद्रीय बँकांचे आक्रमक धोरण, परिणामी व्याजदरातील वृद्धी, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे धोरण, कच्चा तेलातील चढ-उतार, रशिया-युक्रेनचे युद्ध, वायदे बाजारावर झालेला विपरीत परिणाम या सर्वांचा परिपाक या पलायनवादामागे आहे.

भारतातून काढलेला पैसा, परदेशी गुंतवणूकदार चीन आणि युरोपियन देशांमध्ये गुंतवत आहेत. त्याठिकाणी त्यांना चांगला फायदा मिळत आहे. अर्थात या घडामोडींचा भारतीय गुंतवणूकदारांना फायदा होईल. त्यांना कमी किंमतीत शेअर खरेदी करता येतील आणि त्यावर कमाईची संधी शोधता येईल.

Follow Us
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.