AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutual Funds : गुंतवणकूदारांसाठी गुड न्यूज! आता खात्यात लवकर जमा होणार पैसे, काय झाला बदल

Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना आता रक्कमेसाठी ताटकाळत रहावे लागणार नाही.

Mutual Funds : गुंतवणकूदारांसाठी गुड न्यूज! आता खात्यात लवकर जमा होणार पैसे, काय झाला बदल
| Updated on: Jan 28, 2023 | 10:01 AM
Share

नवी दिल्ली : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी (Mutual Fund Investor) खुशखबर आहे. गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी त्यांना आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. आता म्युच्युअल फंडातील रक्कम तात्काळ खात्यात (Account) जमा होणार आहे. त्यासाठी ताटकाळत रहावे लागणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजीपासून हा नियम लागू होईल. त्याचा फायदा देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना होणार आहे. आता दोन दिवसांत रिडेम्पशन केलेली रक्कम खात्यात जमा होईल. शेअर बाजारात (Share Market) 27 जानेवारी 2023 पासून T+ Settlement चा नियम लागू झाला. त्यामुळे शेअर बाजारातील युनिट विक्रीची रक्कम त्याच दिवशी संध्याकाळी खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता मुच्युअल फंडच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनीही नवीन धोरण अंगिकारले आहे. गुंतवणूकदाराने रक्कम काढण्यासाठी विनंती केल्यानंतर व्यवहार प्रक्रियेतील दोन कामकाजाच्या दिवसांत (T+2) ही रक्कम खात्यात जमा होईल.

सध्या, म्युच्युअल फंड युनिट्स युनिट रिडेम्पशन केल्यानंतर साधारणतः तीन दिवसांत रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होते. आता हा कालावधी एका दिवसाने कमी झाला आहे. अर्थात त्याच दिवशी रक्कम खात्यात जमा व्हावी अशी मागणी गुंतवणूकदारांची आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI), ही भारतातील म्युच्युअल फंड व्यवस्थापकांची संघटना आहे. या संघटनेने याविषयीचे एक निवेदन दिले आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजीपासून, बजेटच्या दिवसापासून हा नियम लागू होईल.

या नियमामुळे गुंतवणूकदाराला साधारणतः दोन दिवसांत ही रक्कम मिळेल. त्याच्या बँका खात्यात ही रक्कम जमा होईल. सध्या तीन दिवसांत ही रक्कम जमा होते. आता एक दिवसांचा कालावधी कमी होणार आहे. अडचणीवेळी ही रक्कम गुंतवणूकदाराला उपयोगी ठरेल.

अर्थात गुंतवणूकदारांची मागणी याहून वेगळी आहे. त्यांना रिअल टाईममध्ये ही रक्कम खात्यात हवी आहे. त्यासाठी काही तांत्रिक आणि व्यवस्थापनाविषयक अडचणी आहेत. पण निदान एका दिवसात, 24 तासांत ही रक्कम जमा व्हावी अशी अपेक्षा गुंतवणूकदारांची आहे. शेअर बाजारासारखंच T+ Settlement ची मागणी करण्यात येत आहे. पण यामध्ये काही अडचणी आहेत.

शेअर बाजारात T+1 सुविधेमुळे गुंतवणूकदारांना निधी आणि शेअरमध्ये तेजीने ट्रेड सेटलमेंट करता येत आहेत . त्यांच्या खात्यात आता पूर्वीपेक्षा एक दिवस आधी रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेटलमेंटची सायकल आता लवकर पूर्ण होत आहे.

शेअर बाजारात खरेदीदार आणि विक्री करणारे यांच्यात ट्रेड पूर्ण झाला की रक्कम ही लवकर मिळेल. जुन्या नियमामुळे सेटलमेंटसाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. पण आता एका दिवसातच ट्रेड सेटलमेंट होत आहेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.