कोरोना संकटात ईपीएफओकडून खूशखबर; सदस्यांना 7 लाख रुपयांचे कोरोना विमा कवच

ईपीएफओने ईडीएलआय म्हणजेच एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमअंतर्गत विमा कवच वाढवून सात लाख रुपये केले आहे. (Good news from EPFO in the Corona crisis; Corona insurance cover of Rs 7 lakh to members)

कोरोना संकटात ईपीएफओकडून खूशखबर; सदस्यांना 7 लाख रुपयांचे कोरोना विमा कवच
हा 12 अंकी खास नंबर गमावल्यास थांबू शकते पेन्शन
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 9:01 AM

नवी दिल्ली : देशात सध्या सर्वांनाच कोरोनाची धास्ती आहे. आपल्याला कोरोना संसर्ग झाला तर काय करायचे? अधिक उपचारांसाठी जास्त पैसे लागले तर आणायचे कोठून? आधीच नोकरीची सुरक्षा नाही, त्यात अनेकांच्या हातची नोकरी गेली आहे. मग वैद्यकीय खर्च कसा उभा करायचा, असे अनेक प्रश्न नागरिकांना भंडावून सोडत आहेत. याचदरम्यान नागरिकांना आपल्या भविष्य निर्वाह निधीची अर्थात पीएफची मोठी मदत होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ आपल्या सदस्यांना सात लाख रुपयांपर्यंत कोरोना जीवन विमाची सुविधा देत आहे. याबाबत अधिकाधिक नागरिकांना जागरुक करण्याची सध्या गरज आहे. जेणेकरून नागरिकांना दावेदारी सादर करतानाच विम्याची रक्कम प्राप्त करता येईल. ईपीएफओने ईडीएलआय म्हणजेच एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमअंतर्गत विमा कवच वाढवून सात लाख रुपये केले आहे. (Good news from EPFO in the Corona crisis; Corona insurance cover of Rs 7 lakh to members)

याआधी अडीच लाखापर्यंत मिळत होता विमा

विशेष म्हणजे हे विमा कवच त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, त्यांनी वर्षभरात एकाहून अधिक कंपन्यांमध्ये काम केले आहे. हा दावा कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांचे आजारपण, दुर्घटना आणि नैसर्गिक मृत्यूवरही केला जाऊ शकतो. आतापर्यंत या विमा कवचची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत होती. या योजनेखाली दावा करणारा सदस्य कर्मचाऱ्याचा वारसदार असला पाहिजे. वारसदार व्यक्ती कर्मचाऱ्याचे आजारपण, दुर्घटना, अपघाती आणि नैसर्गिक मृत्यूच्या वेळी दावा करू शकते.

ईपीएफओने सध्याच्या कोरोना संकटात आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणली आहे. कोणात्याही ऑर्गनाईज्ड समूहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी आणि डीएची 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये अर्थात एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडामध्ये जाते. त्याचबरोबर 12 टक्के योगदान कंपनीकडून दिले जाते. कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम एम्प्लॉई पेन्शन स्कीम अर्थात ईपीएसमध्ये जमा होते. अशा प्रकारे ईडीएलआय योजनेत केवळ कंपनीकडून प्रिमियम जमा होतो.

अशाप्रकारे होते दाव्याची गणना

ईडीएलआय स्कीममध्ये दाव्याची गणना कर्मचाऱ्याला मिळालेल्या मागील 12 महिन्यांतील बेसिक सॅलरी आणि डीएच्या आधारे केली जाते. या विम्याचे क्लेम कव्हर शेवटची बेसिक सॅलरी आणि डीएच्या 35 पट असते. जर तुम्हाला शेवटच्या 12 महिन्यांत बेसिक सॅलरी आणि डीए 15 हजार रुपये आहे, तर इन्शुरन्स क्लेम 35 पट म्हणजेच 7 लाख रुपये असेल.

जर ईपीएफ सदस्याचा अकाली मृत्यू झाला तर त्या सदस्याची वारसदार व्यक्ती इन्शुरन्स कव्हरसाठी क्लेम करू शकेल. क्लेम करणारी व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर त्याच्या वतीने त्याचा पालक क्लेम करू शकतो. यासाठी इन्शुरन्स कंपनीला कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, सक्सेशन सर्टिफिकेट, अल्पवयीन वारसदारच्या वतीने अर्ज करणाऱ्या पालकाचे प्रमाणपत्र आणि बँक तपशील द्यावा लागेल. ईपीएफओने आपल्या सदस्यांच्या हिताचा विचार करूनच योग्य प्रमाणात विमा कवचचा लाभ देण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली आहे, असे ईपीएफओचे विभागीय आयुक्त जय कुमार यांनी सांगितले. (Good news from EPFO in the Corona crisis; Corona insurance cover of Rs 7 lakh to members)

इतर बातम्या

कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी किती घातक? जाणून घ्या एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मते

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....