AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेंबे थेंबे तळे साचेलच, आज करा ‘इतकी’ गुंतवणूक, महिन्याला दीड लाख तुमचेच!

गेल्या काही वर्षांत स्थिर ठेवी, सार्वजनिक भविष्य निधी, आवर्ती ठेवी यासारख्या कर्जाच्या साधनांवरील व्याज दर सातत्याने कमी होत आहे.

थेंबे थेंबे तळे साचेलच, आज करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला दीड लाख तुमचेच!
शेअर मार्केट
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 12:49 PM
Share

Mutual fund Investments मुंबई : प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. गेल्या काही वर्षांत स्थिर ठेवी, सार्वजनिक भविष्य निधी, आवर्ती ठेवी यासारख्या कर्जाच्या साधनांवरील व्याज दर सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार स्वत: साठी गुंतवणूकीचे अधिक चांगले पर्याय शोधत असतात. म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पण यात गुंतवणूक करणे हे जोखीमयुक्तही असते. मात्र जर तुम्ही यात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली जर त्या जोखीमेत लक्षणीय घट होते.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक करताना प्रत्येकवेळी महागाईचा वाढता दर लक्षात ठेवणे गरजेचे असते. जर तुम्ही पुढील 20 वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर सरासरी 10-12 टक्के ROI (गुंतवणूक परतावा) सहज मिळतो. मात्र या परताव्याचा महागाईवर तितका परिणाम होत नाही. म्हणजेच समजा सध्या A चा मासिक खर्च 40 हजार रुपये आहे. जर पुढील 20 वर्षानंतर सरासरी 6 ते 7 टक्के महागाई दराच्या आधारे ही रक्कम वाढून 1.25-1.5 इतकी होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत A ला 20 वर्षानंतर निवृत्त होईपर्यंत इतकी गुंतवणूक करावी लागेल, ज्यानुसार त्याला दर महिना दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल.

भविष्यात महागाईचा दर काय?

ET Money Inflation Calculator च्या म्हणण्यानुसार, जर सध्या A चा मासिक खर्च 40 हजार रुपये असेल तर 20 वर्षानंतर सरासरी 7 टक्के महागाई दराने A ला 1.55 लाख रुपयांची गरज आहे. तसेच सरासरी 6 टक्के महागाई दराने ही रक्कम 1.28 लाख रुपये इतकी असेल. तर सरासरी 8 टक्के महागाई दर ही रक्कम 1.86 लाख रुपये इतकी असेल.

किती परतावा मिळणार?

SBI Mutual Fund Calculator च्या मते, जर तुम्ही यात 50 लाख रुपये एकरकमी जमा केले तर 20 वर्षानंतर 10 टक्के परतव्यानुसार तुमच्याकडे 3.36 कोटी रुपये जमा होतील. तर 11 टक्क्यांच्या सरासरी परताव्यानुसार 4 कोटी आणि 12 टक्के परताव्यावर 4.82 कोटी रुपये होतील.

सरासरी 4 टक्के रक्कम काढल्यास 1.5 लाख रुपये मिळणार

ही गुंतवणूक मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी 4 टक्के रक्कम काढता येते. ही रक्कम सरासरी 1.2 लाख ते 1.7 लाखाच्या तुलनेत असते. जर तुम्हाला 20 वर्षानंतर दरमहा 1.5 लाख रुपये उत्पन्न हवे असेल तर सध्या महागाईदरानुसार 40 हजार रुपयांचे मूल्य हे 1.5 लाखांच्या जवळ जाईल. त्यासाठी तुम्हाला एकरकमी 50 लाख रुपये जमा करावे लागतील. या गुंतवणूकीतून येणारा सरासरी परतावा हा 10-12 टक्के असावा लागतो.

(How much invest for get 1.5 lakh monthly income after 20 years)

संबंधित बातम्या :

SBI कडून ग्राहकांसाठी नोटीस जारी, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, ‘या’ गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?

ATM मधून रंग लागलेली नोट बाहेर आली तर काय करावे? नियम काय सांगतो?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली