भारताने इतिहास रचला! आर्थिक महासत्ता अमेरिकेला टाकले मागे, अहवालात उघड

अलीकडेच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले होते की, चीनची नक्कल करून भारत जगातील नवीन उत्पादन केंद्र बनू शकत नाही. जर भारताला या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर त्याला वाढीच्या नवीन उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

भारताने इतिहास रचला! आर्थिक महासत्ता अमेरिकेला टाकले मागे, अहवालात उघड
india money
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 7:52 AM

नवी दिल्लीः भारत अमेरिकेला मागे टाकत जगातील दुसरे सर्वात आकर्षक उत्पादन केंद्र बनले आहे. रिअल इस्टेट सल्लागार कुशमन अँड वेकफील्डने जारी केलेल्या अहवालात हे उघड झालेय. खर्चाच्या आघाडीवर कार्यक्षमतेमुळे उत्पादन केंद्र म्हणून भारताचे आकर्षण वाढलेय, असे या अहवालात म्हटले आहे. अलीकडेच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले होते की, चीनची नक्कल करून भारत जगातील नवीन उत्पादन केंद्र बनू शकत नाही. जर भारताला या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर त्याला वाढीच्या नवीन उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

भारताने अमेरिकेला मागे सोडले

कुशमन अँड वेकफील्डच्या यादीनुसार चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता.

?चीन ?भारत ?अमेरिका ?कॅनडा ?झेक प्रजासत्ताक ?इंडोनेशिया ?लिथुआनिया ?थायलंड ?मलेशिया ?पोलंड

शासनाच्या योजनेचा फायदा होतोय

केंद्र सरकारने देशात उत्पादन वाढवण्यासाठी PLI योजना सुरू केली. याद्वारे कंपन्यांना भारतात त्यांच्या युनिटची स्थापना आणि निर्यात करण्यासाठी विशेष सवलती तसेच आर्थिक सहाय्य दिले जाते. पुढील पाच वर्षांत देशातील उत्पादक कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. यासह देशातील उत्पादन करून भारताचा आयातीवरील खर्च कमी होईल. जेव्हा देशात वस्तू बनवल्या जातील तेव्हा रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.

घरगुती कंपन्यांना संयंत्र उभारण्यासाठी मदत केली जाणार

या योजनेअंतर्गत परदेशी कंपन्यांना भारतात कारखाने उभारण्यासाठी तसेच घरगुती कंपन्यांना संयंत्र उभारण्यासाठी मदत केली जाईल. ही योजना 5 वर्षांसाठी आहे. यामध्ये कंपन्यांना रोख प्रोत्साहन मिळते. सर्व उदयोन्मुख क्षेत्र जसे की ऑटोमोबाईल, नेटवर्किंग उत्पादने, अन्न प्रक्रिया, प्रगत रसायनशास्त्र, दूरसंचार, फार्मा आणि सौर पीव्ही उत्पादन या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अहवालाबद्दल जाणून घ्या

कुशमन अँड वेकफिल्डने निवेदनात म्हटले आहे की, सर्वाधिक मागणी असलेल्या उत्पादन गंतव्यस्थानांमध्ये भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या तुलनेत उत्पादन भारतात रस दाखवत आहे. उत्पादन स्थळ म्हणून भारताचे आकर्षण खर्चाच्या दृष्टीने वाढले आहे. याशिवाय भारताने आऊटसोर्सिंगच्या गरजा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यात. यामुळे वार्षिक आधारावर भारताची क्रमवारी सुधारली आहे.

संबंधित बातम्या

नोकरीत पगाराच्या स्लिपचे काय महत्त्व, जाणून घ्या कामाच्या 10 गोष्टी

Gold Price Today : सोने आणि चांदी स्वस्त, किमतीमध्ये मोठी घट, 10 ग्रॅमची किंमत तपासा

India made history! The economic superpower overtaken the United States, the report revealed

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.