AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh Fine: माफी मागीतल्यानंतरही अर्शदीप सिंहला भरावा लागणार दंड, कारण की…

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत केलेल्या चुकीचा फटका बसला आहे. अंतिम सामन्यात त्याने आयसीसी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे माफी मागूनही त्याला दंड भरावा लागणार आहे.

Arshdeep Singh Fine: माफी मागीतल्यानंतरही अर्शदीप सिंहला भरावा लागणार दंड, कारण की...
Arshdeep Singh Fine: माफी मागीतल्यानंतरही अर्शदीप सिंहला भरावा लागणार दंड, कारण की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 10, 2026 | 6:17 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताने मिळवलं आहे. पण या स्पर्धेतील काही घडामोडी अजूनही प्रभाव टाकत आहेत. या स्पर्धेत अर्शदीप सिंगने जबरदस्त कामगिरी केली होती. टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण अंतिम सामन्यात केलेली एक चूक त्याला भोवली आहे. अर्शदीप सिंग आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याच्या सामना मानधनातून 15 टक्के रक्कम कापली गेली आहे. अर्शदीप सिंगने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेलला रागाच्या भरात चेंडू मारला होता. दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर अर्शदीप सिंगला दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे अर्शदीप सिंगला टी20 वर्ल्डकप अंतिम सामन्याचं मानधन पूर्ण मिळणार नाही. त्याच्या सामना फीमधून 45 हजार रूपये कापले जाणार आहेत. टीम इंडियाच्या एका खेळाडूला एका टी20 सामन्यासाठी 3 लाख मिळतात. त्यामुळे सामना फीमधून 15 टक्के कापले गेल्याने 2 लाख 55 हजार रुपये मिळतील.

अर्शदीप-मिचेल यांच्यात वाद

न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना अर्शदीप सिंगकडे संघाचं 11वं षटक सोपवण्यात आलं होतं. या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मिचेलने षटकार मारला. त्यामुळे अर्शदीप सिंगचा पारा चढला होता. पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मिचेलचा प्रयत्न होता. पण चेंडू सरळ अर्शदीपच्या हाती गेला. त्यामुळे रागाच्या भरात अर्शदीपने चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. पण हा चेंडू डॅरेल मिचेल लागला. अर्शदीपच्या या कृतीचा डॅरेल मिचेलला राग आला. त्यानंतर तो अर्शदीपच्या दिशेने गेला, पण पंचांनी त्याला अडवलं. सूर्यकुमारनेही डॅरेलची समज काढली. त्यानंतर अर्शदीप सिंगने मिचेलजवळ जाऊन माफी मागितली.

सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंगने हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने या सामन्यात घडलेल्या प्रकरणाचा उल्लेख केला. त्याने सांगितलं की, तो चेंडू दुसऱ्या बाजूला फेकत होता, पण चेंडू रिव्हर्स स्विंग झाला. सामन्यानंतर अर्शदीप सिंग आणि डॅरेल मिचेल एकत्र दिसले. यावेळी त्याने पुन्हा एकदा माफी मागितली. पण आयसीसीच्या मते हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्यामुळे दंड ठोठावला आहे. तसं पाहिलं तर बीसीसीआयकडून अर्शदीप सिंगला बक्षिसाच्या रूपाने मोठी रक्कम मिळाली आहे. त्यामुळे 15 टक्के रक्कम कापली तरी फरक पडणार नाही.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.