India : एक, दोन नव्हे तर महाशक्ती होण्यासाठी भारताला हवेत इतके अंबानी आणि अडानी..नीती आयोगाच्या माजी सीईओंनी दाखविला आरसा..

India : भारताला महाशक्ती होण्याचे स्वप्न पडू लागली आहेत. पण त्यासाठीचा मार्ग सोपा नक्कीच नाही..

India : एक, दोन नव्हे तर महाशक्ती होण्यासाठी भारताला हवेत इतके अंबानी आणि अडानी..नीती आयोगाच्या माजी सीईओंनी दाखविला आरसा..
महाशक्ती होण्यासाठीचा रोडमॅपImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 4:09 PM

नवी दिल्ली : भारत जगाच्या नकाशावर महाशक्ती (Powerful Nation) म्हणून उदयास येण्याची कसरत करत आहे. देशाला महाशक्ती होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. यात वाईट काहीच नाही. पण त्यासाठीचे प्रयत्न किती तोकडे आहेत, याची जाणीव नीती आयोगाचे (Niti Aayog) पूर्व सीईओ अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी करुन दिले. त्यांनी देशाला आणि नियोजनकारांना आरसाच दाखविला. त्यांचा दावा समजून घेऊयात..तरच देश महाशक्ती होऊ शकतो..

Amitabh Kant यांना G-20 संघटनेचे शेरपा वा थिंक टँकर म्हणून ही ओळखल्या जाते. यावरुन त्यांचे महत्व किती आहे, हे अधोरेखित होते. त्यांनी भारताला हा टप्पा गाठण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील हे एका वाक्यात स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी G-20 संघटनेचा नवीन लोगो आणि थीमचे उद्धघाटन केले. 1 डिसेंबरपासून भारत G-20 संघटनेचा अध्यक्ष होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमिताभ कांत यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे.

हे सुद्धा वाचा

अमिताभ कांत यांच्या मते, देशाला महाशक्ती म्हणून जगाच्या नकाशावर झेंडा फडकवायचा असेल तर, भारताकडे एक-दोन अंबानी आणि अडानी असून भागणार नाही. त्यासाठी भारताकडे 10 हजार अंबानी आणि 20 हजार अडानींची फौज असणे आवश्यक आहे.

अमिताभ कांत यांना G-20 संघटनेसाठी भारताकडून शेरपा म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. हे पद अत्यंत महत्वाचे मानण्यात येते. त्यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे शेरपा पद होते.

इंडोनेशियात होणाऱ्या G-20 संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. त्यानंतर भारताला या संघटनेचे अध्यक्षपद मिळणार आहे. G-20 संघटनेत ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रांस, रशिया, अमेरिका समवेत अनेक देशांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.