AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India : एक, दोन नव्हे तर महाशक्ती होण्यासाठी भारताला हवेत इतके अंबानी आणि अडानी..नीती आयोगाच्या माजी सीईओंनी दाखविला आरसा..

India : भारताला महाशक्ती होण्याचे स्वप्न पडू लागली आहेत. पण त्यासाठीचा मार्ग सोपा नक्कीच नाही..

India : एक, दोन नव्हे तर महाशक्ती होण्यासाठी भारताला हवेत इतके अंबानी आणि अडानी..नीती आयोगाच्या माजी सीईओंनी दाखविला आरसा..
महाशक्ती होण्यासाठीचा रोडमॅपImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 09, 2022 | 4:09 PM
Share

नवी दिल्ली : भारत जगाच्या नकाशावर महाशक्ती (Powerful Nation) म्हणून उदयास येण्याची कसरत करत आहे. देशाला महाशक्ती होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. यात वाईट काहीच नाही. पण त्यासाठीचे प्रयत्न किती तोकडे आहेत, याची जाणीव नीती आयोगाचे (Niti Aayog) पूर्व सीईओ अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी करुन दिले. त्यांनी देशाला आणि नियोजनकारांना आरसाच दाखविला. त्यांचा दावा समजून घेऊयात..तरच देश महाशक्ती होऊ शकतो..

Amitabh Kant यांना G-20 संघटनेचे शेरपा वा थिंक टँकर म्हणून ही ओळखल्या जाते. यावरुन त्यांचे महत्व किती आहे, हे अधोरेखित होते. त्यांनी भारताला हा टप्पा गाठण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील हे एका वाक्यात स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी G-20 संघटनेचा नवीन लोगो आणि थीमचे उद्धघाटन केले. 1 डिसेंबरपासून भारत G-20 संघटनेचा अध्यक्ष होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमिताभ कांत यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे.

अमिताभ कांत यांच्या मते, देशाला महाशक्ती म्हणून जगाच्या नकाशावर झेंडा फडकवायचा असेल तर, भारताकडे एक-दोन अंबानी आणि अडानी असून भागणार नाही. त्यासाठी भारताकडे 10 हजार अंबानी आणि 20 हजार अडानींची फौज असणे आवश्यक आहे.

अमिताभ कांत यांना G-20 संघटनेसाठी भारताकडून शेरपा म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. हे पद अत्यंत महत्वाचे मानण्यात येते. त्यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे शेरपा पद होते.

इंडोनेशियात होणाऱ्या G-20 संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. त्यानंतर भारताला या संघटनेचे अध्यक्षपद मिळणार आहे. G-20 संघटनेत ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रांस, रशिया, अमेरिका समवेत अनेक देशांचा समावेश आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.