विमा कंपनीने तुमचाही क्लेम फेटाळलाय? तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला आहे. यादरम्यान अनेकांना आरोग्य संबंधित समस्येमुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत. जर विमा कंपनीने तुमचाही क्लेम नाकारला असेल आणि जर तुमची संपूर्ण प्रक्रिया रितसर केली असेल तर तुम्ही याविरोधात विमा कंपनीकडे तक्रार करु शकता. (Insurance Company reject your claim know how to file complaint To IRDA Check All details)
जर तुम्हीही एखाद्या विमा कंपनीवर नाराज असाल किंवा तुम्हाला विमा कंपनीची तक्रार करायची असेल, तर तुम्हीही हे करु शकता. यासाठी तुम्ही IRDA कडे विमा कंपन्यांची तक्रार करु शकता. या तक्रारीनंतर जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही थेट विमा लोकपालकडे देखील तक्रार करू शकता. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आणि तक्रारी संदर्भात कोणते नियम आहेत? याची माहिती असणे गरजेचे आहे.
प्रक्रिया काय?
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवावी लागेल. या तक्रारीवर तुम्हाला 15 दिवसात योग्य उत्तर न मिळाल्या तुम्ही याविरोधात IRDA कडे धाव घेऊ शकता.
- IRDA कडे तक्रार नोंदवण्यासाठी complaints@irdai.gov.in या ईमेल आयडीवर तक्रार दाखल करु शकता.
- तसेच तुम्ही IRDA च्या टोल फ्री क्रमांकावर 155255 किंवा 1800 4254 732 वर देखील तक्रार करू शकता.
- जर तुम्ही ही तक्रार केल्यानंतर त्यावर काहीही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार करू शकता.
विमा लोकपाल म्हणजे काय?
विमा लोकपाल हा विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात समन्वय साधतो. तसेच हा व्यक्ती कागदाच्या आधारे क्लेमची रक्कम देखील निश्चित करू शकतो. जर इन्शुअर व्यक्ती क्लेम रकमेस सहमत असेल तर ऑर्डर पास केली जाते. यानंतर कंपनीला 15 दिवसांच्या आत त्याचे पालन करावे लागते. यानंतर मग लोकपाल निर्णय सुनावतो, जो विमा कंपनीला स्विकारावा लागतो.
या व्यतिरिक्त तुम्ही ग्राहक आयोगात कंपनीविरोधात तक्रार दाखल करु शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा मिळते. मात्र त्यानंतर तुम्हाला ग्राहक न्यायालयात हजर व्हावे लागेल. तसेच यानंतर तुम्हाला न्याय मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मात्र यात दावा करणार्या लोकांनी विमा कंपनीच्या सर्व अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण जर यानंतर कंपनीने तुमचा दावा फेटाळला तरी तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
वाढलेले वजन 1 आठवड्यात कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या, वाचा याबद्दल अधिक! https://t.co/Ja75sdG9C6 #WeightLoss | #Drink | | #HealthCare | #HealthTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 9, 2021
(Insurance Company reject your claim know how to file complaint To IRDA Check All details)
संबंधित बातम्या :
ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, बँकेच्या FD व्याजदरात बदल, कोणत्या बँकेत सर्वाधिक व्याज?
LIC ची भन्नाट पॉलिसी, दर दिवसाला 60 रुपयांची बचत करा, 6 लाख रुपये मिळवा
पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये करा गुंतवणूक, दुप्पट मिळेल फायदा, जाणून घ्या कसा मिळेल लाभ