AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमीन खरेदीला वितुष्टांचे ग्रहण;  रजिस्ट्री रद्द होण्यासाठी ही परिस्थिती ठरु शकते कारणीभूत

जमिनीचा एक तुकडा नावावर असावा अशी अनेकांची इच्छा असते. पण जमिनीचा व्यवहार आला की वाद आला आणि या कलहात तुम्ही नावावर केलेल्या जमिनीवरील तुमचे नाव ही कमी होऊ शकते. जाणून घ्या या परिस्थितीत होऊ शकते तुमच्या जमिनीची नोंदणी रद्द वादविवाद असेल तर रजिस्ट्री रद्द होईल वेळेत व्यवहार पूर्ण केला नसेल तर खरेदी रद्द होईल खोट्या तक्रारीही आणू शकतात अडचणी

जमीन खरेदीला वितुष्टांचे ग्रहण;  रजिस्ट्री रद्द होण्यासाठी ही परिस्थिती ठरु शकते कारणीभूत
जमीन खरेदी
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 9:27 AM
Share

मालमत्ता खरेदीनंतर, जमिनीची रजिस्ट्री केल्यानंतर बहुतेक वेळा लोक निश्चिंत होतात. आता आपण जमिनीचे मालक झाल्याची त्यांची भावना होऊन जाते. मात्र कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यास तुमचा हा भ्रम लवकरच डोकेदुखी होऊ शकतो. सर्वाधिक सतर्कता जमीन खरेदी करतानाच दाखवायला हवी. नाहीतर तुम्हाला पुढील अनेक वर्षे कोर्टकचेरीत खेटे मारण्यात खर्ची करावी लागतील.

जमीन खरेदीतील हे बारकावे तुम्हाला या झंझटीतून मुक्ती देऊ शकता. जमीन रजिस्ट्रीनंतर एका निश्चित कालावधीत या रजिस्ट्रीसंबंधी हरकत घेता येते. विक्रेत्याचे नातेवाईक, हिस्सेदार यांचा त्यात समावेश असतो. तर चला समजून घेऊ, कोणत्या परिस्थितीत तुमच्या रजिस्ट्रीवर हरकत घेता येऊ शकते. कोणत्या परिस्थितीत तुम्ही खरेदी केलेल्या जमिनीची रजिस्ट्री रद्द होऊ शकते.

विक्री करणा-याचीच हरकत

रजिस्ट्री केल्यानंतर जमीन विक्री झाल्याची माहिती विक्रेत्याला देण्यात येते. तसेच सदर जमिनीवरील त्याचे नाव कमी करण्यात येते आणि खरेदीदाराचे नाव जमिनीसंबंधीत कागदपत्रांवर घेण्यात येते, अर्थात त्याच्या नावाची नोंद करण्यात येते. याविषयी विक्रेत्याला हरकत असल्यास तो नोंदवू शकतो.

दाव्याचा

ही सर्वात महत्वाची प्रक्रिया असते. जमीन विक्रीत प्रंचड घोळ असतो. खूप मोठी फसवणूक होण्याचे प्रकार लक्षात घेता. जमीन विक्री दाव्याचा पडताळा करण्यात येतो. विक्री करणारा खरंच जमीन विक्री करत आहे का, का त्याच्यावर दुसराच व्यक्ती विक्री व्यवहार करत आहे, याचा पडताळा करण्यात येतो. किंवा विक्रेता दबावाखाली जमीन विक्री करत तर नाही ना हे तपासते येते.

या अवधीत घेता येते हरकत

जमीन रजिस्ट्रीनंतर त्यावर हरकत नोंदविता येते. त्यासाठी देशातील विविध राज्यात वेगवेगळी मुदत आहे. राज्यात जमीन खरेदी करताना 15 दिवसांच्या आत हितसंबंधी व्यक्ती फेरफारबाबहत हरकत घेऊ शकते. फेरफार नोंदी नोटीस दरम्यान कुणीही हरकत घेतली नाही तर संबंधित अधिकारी नोंद प्रमाणित करतो.

तर रजिस्ट्री होईल रद्द

विक्रेत्याला व्यवहाराची रक्कम वेळेत न मिळाल्यास अडचण येऊ शकते. विक्रेता हरकत घेऊन विक्री व्यवहार थांबवू शकतो. तो अडून बसल्यास फेरफार नोंद रद्द होते. विक्री करणा-याच्या नातेवाईकांनी अथवा हिस्सेदारांनी आक्षेप घेतल्यास जमिनीची रजिस्ट्री थांबते आणि त्यांचा दावा प्रमाणित झाल्यास रजिस्ट्री रद्द होऊ शकते. तहसील कार्यालायत आणि मंडळ अधिका-यांकडे या सर्व दस्त नोंदणीची प्रक्रिया पार पडते. याठिकाणी रोजचे व्यवहार घडताना वादविवाद होणे नित्याचीच घटना असते.

संबंधित बातम्या : 

डेडलाईन संपली तर सोडावे लागेल 7 लाखांवर पाणी, ई-नॉमिनेशन फॉर्म भरा नुकसान टाळा; EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट

Home Loan | कमाईवर नको गृहकर्जाचा भार, योग्य EMI निवडल्यास आर्थिक ओढाताण टळणार

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.