AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्याला जमा करा 794 रुपये आणि मॅच्युरिटीपूर्वीच व्हा लखपती आणि पैसे ही भरावे लागतील कमी

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये कमीतकमी एकूण विमा रक्कम 2 लाख रुपयांची तर अधिकत्तम विमा रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही. ही एक मर्यादीत प्रिमियम पॉलिसी आहे. ज्यात पॉलिसी कालावधीपेक्षा कमी रक्कम जमा करुन लखपती होता येते.

महिन्याला जमा करा 794 रुपये आणि मॅच्युरिटीपूर्वीच व्हा लखपती आणि पैसे ही भरावे लागतील कमी
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 24, 2022 | 1:59 PM
Share

आज आपण एलआयसीची सर्वाधिक विक्री होणा-या जीवन विमा योजनेविषयी (Life Insurance Policy), या योजनेचे नाव आहे, जीवन लाभ पॉलिसी (Jeevan Labh Policy). या योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचा फायदा देण्यात येतो. हा फायदा बोनस रुपात मिळतो. यामध्ये पहिला बोनस हा पहिला पुनरावृत्ती (Revisionary) बोनस दिल्या जातो. तर शेवटचा बोनस हा अतिरिक्त (Additional) बोनस असतो. ग्राहकांना वेळेनुसार, दोन्ही बोनसचे फायदे देण्यात येतात. या पॉलिसी अंतर्गत ग्राहकाला कसा फायदा देण्यात येतो, याविषयी जाणून घेतानाच या पॉलिसीचे वैशिष्टये ही समजून घेऊयात.या पॉलिसीचे वैशिष्ट्ये म्हणजे दरमहा 794 रुपयांचा प्रिमियम भरुन विमाधारकाला (Policyholder) कालावधी पूर्ण होण्याअगोदरच 5.25 लाख रुपये मिळू शकतात. यासोबतच या योजनेच्या कालावधी दरम्यान ग्राहकाला विमा संरक्षण कवच ही मिळते. ही पॉलिसी 8 वर्षाच्या मुलापासून ते अधिकत्तम 50 वर्षांच्या व्यक्तीला घेता येते. अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे, या पॉलिसीवर ग्राहकाला कर्ज सुविधा ही मिळते.

जीवन लाभ पॉलिसीमध्ये कमीतकमी विमा रक्कम 2 लाख रुपयांची तर अधिकत्तम विमा रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही. ही एक मर्यादीत प्रिमियम पॉलिसी आहे. यामध्ये ठराविक कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी रक्कम भरावी लागते. 15 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 वर्षे, 21 वर्षांच्या पॉलिसीसाठी 15 वर्षे आणि 25 वर्षांच्या पॉलिसीसाठी 16 वर्षांचा हप्ता भरावा लागणार आहे. जर दर महिन्याला 794 रुपयांचा प्रिमियम भरुन दरवर्षी विमाधारकाला 9,340 रुपयांचा हप्ता जमा करता येईल. म्हणजे पूर्ण कालावधीसाठी ग्राहकाला 1,49,045 रुपयांचा प्रिमियम जमा करावा लागणार आहे. जेव्हा पॉलिसीला 25 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा कालावधी पूर्ण होईल.

काय आहेत म्युच्युरिटीचे लाभ

ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक केल्यावर विम्याचे दोन लाख रुपये मिळतील. पुनरावृत्ती बोनसचा फायदा त्याला मिळेल. त्यापोटी 2,35,000 रुपये आणि अंतिम अतिरिक्त बोनसचे 90,000 रुपये मिळतील. म्हणजे विमाधारकाला सर्व रक्कम मिळून एकूण मॅच्युरिटी रक्कम 5,25,000 रुपये मिळतील. म्हणजे विमाधारकाला 1,49,045 रुपयांचा प्रिमियम जमा केल्यावर 5,25,000 रुपये मिळतील.

विमा संरक्षणाचा काय फायदा मिळेल

आता या योजनेत काय विमा संरक्षण मिळते हे बघुयात. जर ही विमा योजना घेतल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास विमाधारकाच्या वारसदारांना विमा संरक्षणाची रक्कम मिळेल. वारसदाराला विमा पॉलिसीचे दोन लाख रुपये तर मिळतीलच सोबतच त्याला पुनरावृत्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनसची रक्कम मिळले. ही रक्कम पॉलिसीत किती रक्कम जमा करण्यात आली यावर आधारीत असेल. विमाधारकाला या पॉलिसीवर कर्ज ही काढता येईल.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.