AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एआय’ मुळे नोकऱ्या जाणार का? नारायण मूर्ती यांनी सांगितले नेमका कसा होणार परिणाम

narayana murthy on Artificial Intelligence: एआयमुळे नोकऱ्या जाणाऱ्या असल्याची भीती जास्त प्रमाणात व्यक्त केली जात आहे. परंतु एआय नोकऱ्या कशा पद्धतीने बदलून देणार, त्यावर चर्चा होत नाही. एआयचे स्वागत केले पाहिजे. त्याचा एक चांगला टूल म्हणून वापर केला पाहिजे.

'एआय' मुळे नोकऱ्या जाणार का? नारायण मूर्ती यांनी सांगितले नेमका कसा होणार परिणाम
narayana murthy
| Updated on: May 18, 2024 | 10:22 AM
Share

एआईचा (Artificial Intelligence) वापर संपूर्ण जगात वाढत आहे. जगभरातील अनेक कंपन्यांनी एआयचा वापर सुरु केला आहे. एआय आल्यामुळे अनेक कामे सोपी होत आहेत. परंतु ज्या पद्धतीने एआयचा वापर वाढत आहे, ते पाहिल्यावर भविष्यात एआयमुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर आता इन्फोसिस कंपनीचे फाउंडर एन.आर. नारायणमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले नारायणमूर्ती

नारायणमूर्ती म्हणाले की, मानवाची बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा कोणीच सामना करु शकत नाही. त्यासाठी त्यांनी 1975 मधील तंत्रज्ञान ‘केस टूल्स’ चे उदाहरण दिले. त्यावेळी सॉफ्टवेयर डेव्हलेपमेंटमुळे नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु प्रकार उलटाच घडला. त्यानंतर रोजगाराच्या अनेक संधी आल्या.

एआयमुळे नोकऱ्या जाणाऱ्या असल्याची भीती जास्त प्रमाणात व्यक्त केली जात आहे. परंतु एआय नोकऱ्या कशा पद्धतीने बदलून देणार, त्यावर चर्चा होत नाही. एआयचे स्वागत केले पाहिजे. त्याचा एक चांगला टूल म्हणून वापर केला पाहिजे. सर्वसाधारणपणे तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल आणि विशेषतः AI च्या भूमिकेबद्दल पुरेसा मी आशावाद आहे. तथापि, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण AI ला उपयुक्त साधन बनवण्याचा प्रयत्न करु. मानवी बुद्धी हिच सर्वश्रेष्ठ आहे. मी औद्योगिक क्षेत्रात एआयच्या वापराबाबत अधिक आशावादी आहे, असे त्यांनी म्हटले.

नोकऱ्या जाण्याच्या चर्चा फेटाळल्या

नारायण मूर्ती यांनी एआयने नोकऱ्या जाण्याच्या चर्चा त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावल्या. यापूर्वी त्यांनी त्या चर्चांना उत्तर दिले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या स्थापना दिनाप्रसंगी बोलताना एआयमुळे जीवन आरामदायी बनणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच मानव कधीच तंत्रज्ञानाला आपल्यावर वरचढ होऊ देणार नाही. मानवी मन तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे आहे, असे त्यांनी म्हटले होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.