AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदेशात राहणाऱ्या भारतीयांची कमाल, प्रथमच विक्रमी संख्येने भारतात पाठवला पैसा

Diaspora Remittances Hit New Record: गेल्या 10 वर्षांच्या आकडेवारीनुसार भारत हा सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश आहे. जागतिक बँकेच्या अहवालात त्याची पुष्टी करण्यात आली आहे.आरबीआयच्या अहवालानुसार परदेशातून येणाऱ्या एकूण रेमिटन्सपैकी 45 टक्के वाटा ब्रिटन, अमेरिका आणि सिंगापूरचा आहे.

विदेशात राहणाऱ्या भारतीयांची कमाल, प्रथमच विक्रमी संख्येने भारतात पाठवला पैसा
फाईल फोटो
| Updated on: Jul 01, 2025 | 12:27 PM
Share

Diaspora Remittances Hit New Record: देशाच्या अर्थव्यवस्थेत विदेशात राहणाऱ्या भारतीयांचे मोठे योगदान आहे. मागील आर्थिक वर्षात विक्रमी संख्येने विदेशात राहणाऱ्या भारतीयांनी देशात पैसा पाठवला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात 135.46 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1.16 लाख कोटी रुपये आपल्या परिवारांकडे पाठवले आहे. आतापर्यंत वर्षभरात पाठवलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

आठ वर्षात दुप्पट रक्कम

आठ वर्षांपूर्वी अनिवासी भारतीयांनी 61 अब्ज डॉलर्स पाठवले होते. परंतु आज ही रक्कम दुप्पट झाली आहे. म्हणजेच वार्षिक आधारावर पाहिले तर त्यात सुमारे 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी अनिवासी भारतीयांची समृद्धी दाखवत आहे. गेल्या 10 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारत हा सर्वाधिक रेमिटन्स (परदेशातून आपल्या देशात पाठवलेला पैसा) मिळवणारा देश आहे. जागतिक बँकेच्या अहवालात त्याची पुष्टी करण्यात आली आहे. या अहवालानुसार 2024 मध्ये मेक्सिको 5.8 लाख कोटी रुपयांच्या रेमिटन्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच चीन 4.1 लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अशी पाठवली रक्कम

आठ वर्षांत रेमिटेंसची रक्कम दुप्पच झाली आहे. सन 2014-15 दरम्यान 6 लाख कोटी, 2015-16 दरम्यान 5.62 लाख कोटी, 2016-17 दरम्यान 5.26 लाख कोटी, 2017-18 दरम्यान 5.93 लाख कोटी, 2018-19 दरम्यान 6.55 लाख कोटी, 2019-2020 दरम्यान 7.13 लाख कोटी, 2020-21 दरम्यान 6.87 लाख कोटी रुपये भारतात आले.

रेमिटन्स मिळवण्यात केरळची आघाडी

आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान 7.64 लाख कोटी, 2022-23 दरम्यान 9.64 लाख कोटी, 2023-24 दरम्यान 10.18 लाख कोटी आणि 2025-25 दरम्यान 11.63 लाख कोटी रुपये अनिवासी भारतीयांनी देशात पाठवले. आरबीआयच्या अहवालानुसार परदेशातून येणाऱ्या एकूण रेमिटन्सपैकी 45 टक्के वाटा ब्रिटन, अमेरिका आणि सिंगापूरचा आहे. सध्या व्यापार तूटच्या सुमारे 47 टक्के रक्कम रेमिटन्स भरून काढत आहेत. भारतात रेमिटन्स मिळवणाऱ्या राज्यांमध्ये केरळ, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. विशेषतः केरळमध्ये पैसे पाठवणारे सर्वाधिक संख्येने अनिवासी भारतीय आहे. त्यात आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांचे योगदान जास्त आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.