AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 वाजता मेल, झोपेतून कर्मचारी उठताच धक्का, भारतात सर्वात मोठी कपात, 2600 कर्मचाऱ्यांना काढले कामाहून, बड्या कंपनीत..

नुकताच एक धक्कादायक घटना पुढे आली. एकाच वेळी एका बड्या कंपनीने तब्बल 2600 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. हेच नाही तर पहाटे 4 वाजता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मेल करण्यात आला. हा मेल पाहून कर्मचाऱ्यांची झोपच उडाली.

4 वाजता मेल, झोपेतून कर्मचारी उठताच धक्का, भारतात सर्वात मोठी कपात, 2600 कर्मचाऱ्यांना काढले कामाहून, बड्या कंपनीत..
Visa
| Updated on: Aug 08, 2026 | 12:13 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांना कामाहून काढण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामाहून काढून घरी बसवले. त्यामध्येच आता अजून एका बड्या कंपनीने आपल्या तब्बल 2600 कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नारळ दिले. भारतीय वेळेनुसार, सकाळी 4 वाजता या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून एक मेल आला. त्यात त्यांना काढून टाकण्यात आल्याबद्दल माहिती देण्यात आली. फक्त हेच नाही तर त्यांना आजपासूनच कंपनीत प्रवेश मिळणार नसल्याचे त्या मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले. या कंपनीने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील कर्मचाऱ्यांना हा मेल पाठवला. आपल्या सर्वांच्या ATM कार्डवर नाव असलेली कंपनी VISA या बड्या कंपनीने मोठी कपात केली. ज्यामुळे खळबळ उडाली. सकाळी सकाळी कंपनीचा मेल पाहून कर्मचाऱ्यांची झोप उडाली.

भारतासोबतच जगभरातून तब्बल 2600 कर्मचाऱ्यांची कपात केली. कर्मचारी पहाटे साखर झोपेत असतानाच सकाळी 4 वाजता याबाबतचा मेल त्यांना आला. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठलेल्या कर्मचाऱ्यांची हा मेल पाहून धांदळ उडाली. काय करावे आणि काय नाही हे देखील त्यांना सूचत नव्हते. एका वेळेसाठी सर्वकाही थांबले.

मेटा, गूगल, अॅमेझान, सिस्को आणि ओरॅकल या मोठ्या कंपन्यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांना कामाहून काढले. ATM ला VISA कंपनी सपोर्ट करते. ही एक बडी पेमेंट कंपनी आहे. डिजीटल सपोर्टसाठी ही एक जगप्रसिद्ध कंपनी आहे. 2600 कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक जास्त भारतीय कर्मचाऱ्यांना कंपनीने काढल्याचे कळते. मात्र, नक्की किती कर्मचाऱ्यांना भारतातून काढण्यात आले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मुंबई, हैद्राबाद, बंगळूर, चैन्नई या शहरांमधील व्हिसाच्या कंपन्यांना मेल आली आहेत.

मात्र, या कर्मचाऱ्यांना नक्की कोणत्या गोष्टीवरून कामाहून काढण्यात आले, याबाबतची माहिती पुढे येऊ शकली नाही. कंपनीची आर्थिक स्थितीही चांगली असल्याचे सांगितले जातंय. सोशल मीडियावर मुथुकृष्णन धंदापणी या नावाच्या व्यक्तीने पोस्ट केली. व्हिसाच्या बंगलूरू येथील कार्यालयातील 1400 कर्मचाऱ्यांना कंपनीने काढल्याचे कळतंय. AI चे कारण कंपनीकडून पुढे केल्याचेही सांगितले जातंय. कामाच्या पद्धतीमध्ये त्यांना काही बदल करायची आहेत.

Follow Us
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा...
Mumbai High Court | मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार?; सरकारचा हायकोर्टात मोठा दावा, उपवर्गीकरणाचा दाखला देत काय म्हटलं?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?
Abhijeet Dipke | पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?; नेमकी काय आहे मागणी?
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणी
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सांगितलं गुपित
पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय घडामोडींना वेग
Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने...
मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!