AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा पण रडवणार कांदा, या 6 राज्यात असा वधारला भाव

Onion Rate | दिल्लीसह दक्षिणेतील पुद्दुचेरीमध्ये कांद्याचे भाव 70 रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशातील 6 राज्ये अशी आहेत, जिथे कांद्याचे भाव 60 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे यंदा कांदा रडवणार का? अशी भीती आहे. केंद्र सरकारने किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय योजना केली आहे. त्यांनी हस्तक्षेप केला आहे.

यंदा पण रडवणार कांदा, या 6 राज्यात असा वधारला भाव
| Updated on: Oct 31, 2023 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत कांद्याने सध्या खळबळ उडून दिली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यात तर दक्षिणेतील काही राज्यात काद्यांने 70 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील 6 राज्यांमध्ये कांद्याची किंमत 60 रुपयांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकार अलर्टवर आहे. कांदाने यापूर्वी पण देशात रोष वाढला होता. कांद्याने यापूर्वी अनेक राज्य सरकारांना हादरे पण दिले होते. केंद्र सरकारने किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी आता तातडीने उपाय योजना केली आहे. कमी उत्पादन आणि वेळेवर पुरवठा न झाल्याने काद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.

बफर स्टॉक बाजारात

कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉक बाजारात आणला आहे. पण त्याचा थेट परिणाम दिसला नाही. अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या किंमती 70 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहेत. किरकोळ बाजारात हा भाव 80 रुपये किलोवर पोहचल्याचे चित्र आहे. तर काही राज्यात हा भाव 60 रुपयांच्या घरात पोहचला आहे.

देशातील या 8 राज्यांमध्ये कांद्याचा भाव सर्वाधिक

  1. राजधानी दिल्लीत कांद्याचा दर 78 रुपये किलोवर पोहचला आहे. राजधानीत कांद्याची किरकोळ विक्री जास्त दराने होत असल्याची ओरड आहे.
  2. गुजरातमध्ये प्रतिनुसार, काद्यांच्या किंमती कमी जास्त आहेत. कांद्याचा भाव 75 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहचतो.
  3. दक्षिण भारतात पुद्दुचेरीमध्ये कांद्याचा भाव 70 रुपयांवर पोहचला आहे.
  4. गोवेकरांना पण जादा दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. कांद्याचा भाव 67.5 रुपये आहे.
  5. तामिळनाडूमध्ये कांदा महागला आहे. काद्यांची किंमत 65.86 रुपये प्रति किलो आहे.
  6. स्वर्गीय भूमी केरळमध्ये पण कांद्याचे दर वधारले आहेत. या राज्यात कांद्याचा भाव 65.57 रुपये आहे.
  7. ईशान्येतील मेघालयात पण किंमती अधिक आहे. येथील काद्यांचा दर 64.6 रुपये आहे.
  8. दादरा नगर हवेलीतही कांद्याचे भाव जास्त आहे. कांद्याचा भाव 63 रुपयांवर पोहोचला आहे.
  9. अंदमान निकोबारमध्ये कांद्याचा दर 60 रुपयांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात पण कांदा 60 रुपयांच्या घरात पोहचला आहे.

कशामुळे ही दरवाढ?

खराब हवामानामुळे खरीप काद्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पेरणी उशीरा झाल्याने कांदा पिकाला फटका बसला. खरीप पीक लवकर हाती येणार नसल्याने बाजारात तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे चित्र आहे. काद्यांचा साठा कमी होत आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येत आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत