AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm मध्ये महाभरती, तब्बल 4000 जणांना नोकरी मिळणार; कंपनी लवकरच…प्लॅन काय?

पेटीएमने ही भरती प्रकिया मार्च 2027 पर्यंत राबवली जाईल, असे सांगितले आहे. कंपनीने सांगितल्यानुसार गेल्या दोन महिन्यात 800 पेक्षा जास्त लोकांना पेटीएममध्ये नोकरी देण्यात आली आहे.

Paytm मध्ये महाभरती, तब्बल 4000 जणांना नोकरी मिळणार; कंपनी लवकरच...प्लॅन काय?
paytm recruitmentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 09, 2026 | 4:48 PM
Share

Paytm Recruitment : देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएम या कंपनीने एक खुशखबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीकडून पुढील साधारण नऊ महिन्यात एकूण 4000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येकाच्या कामगिरीचा अभ्यास करून एकूण 400 कर्मचारी कमीदेखील केले जाणार आहेत. पेटीएम कंपनीला आगामी काळात आपल्या मर्चंट नेटवर्कला मजबूत करणार आहे. तसेच भविष्यात ही कंपनी एआयवर आधारलेल्या सेवांवरही भर देणार आहे. त्यामुळेच या कंपनीकडून तब्बल 4000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

पेटीएममध्ये होणार 4000 कर्मचाऱ्यांची भरती

मिळालेल्या माहितीनुसार पेटीएमने ही भरती प्रकिया मार्च 2027 पर्यंत राबवली जाईल, असे सांगितले आहे. कंपनीने सांगितल्यानुसार गेल्या दोन महिन्यात 800 पेक्षा जास्त लोकांना पेटीएममध्ये नोकरी देण्यात आली आहे. आता आणखी 4000 कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही नवी भरती प्रोडक्ट, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता या विभागात केली जाणार आहे. आपल्या मर्चंट नेटवर्कला वेगाने वाढवण्यासाठी तसेच एआयवर आधारलेल्या सर्व्हिसचा आणखी विस्तार करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या पेटीएम कंपनीकडे 40 हजार कर्मचारी काम करतात. त्यानंतर आता कंपनीच्या कर्मचाऱ्यांत आणखी 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार

एकीकडे पेटीएम भविष्यात एकूण 4000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे, असे सांगण्यात आले आहे. परंतु दुसरीकडे परफॉर्मन्स अप्रेजल सायकल पूर्ण झाल्यानंतर साधारण एक टक्के म्हणजेच 400 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.

2010 साली झाली कंपनीची सुरुवात

दरम्यान, पेटीएम कंपनीने गेल्या चार तिमाही निकालात नफा नोंदवला आहे. कायदेशीर आव्हान मिळाल्यावर या कंपनीने आपल्या कारभारात अनेक बदल केले आहे. या कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा हे आपल्या कोट्यवधी युजर्सना कर्ज, गुंतवणूक तसेच अन्य आर्थिक सेवांच्या माध्यमातून कंपनीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कंपनी 2010 साली सुरू झाली होती. या कंपनीकडून अगोदर मोबाईल रिचार्जचे काम केले जायचे. त्यानंतर ही कंपनी डिजिटल आर्थिक व्यवहार तसेच बँकिंग क्षेत्रात आली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार