AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ration : एक देश, एक राशन कार्डचा मोठा फायदा, इतक्या कोटी जनतेला अन्नाचा घास भरविल्याचा दावा, आतापर्यंत खर्च झाले एवढे कोटी रुपये..

Ration : देशात राशन वाटपातही नवीन विक्रम केल्याचा केंद्र सरकारने दावा केला आहे..

Ration : एक देश, एक राशन कार्डचा मोठा फायदा, इतक्या कोटी जनतेला अन्नाचा घास भरविल्याचा दावा, आतापर्यंत खर्च झाले एवढे कोटी रुपये..
मोफत राशनचा फायदाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 22, 2022 | 11:42 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना (Corona) काळात गरिबांची उपासमार होऊ नये आणि त्यांना हक्काचे राशन (Ration) मिळावे यासाठी केंद्र सरकारने (Central Government) भगीरथ प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार, देशातील 80 कोटी गरीब जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PM Garib Kalyan Ann Yojana) सुरु करण्यात आली केली होती. तेव्हापासून या योजनेत गरिबांना मोफत राशन देण्या येत आहे. याप्रकारे देशाने मोठा विक्रम केला आहे. गुरुवारी केंद्र सरकारने या योजनेवरील खर्चाचा तपशील सार्वजनिक केला.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी या योजनेतंर्गत एप्रिल 2020 पासून गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत या योजनेवर केंद्र सरकारने 3.9 लाख कोटी रुपये खर्च केल्याचे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.

PMGKAY योजना एप्रिल 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती. दरम्यान कोविडच्या तीन लाटांनी देशाला हादरवले. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ही योजना डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली होती.

सातव्या टप्प्यात ही योजना तीन महिन्यापर्यंत वाढविण्यात आली. या योजनेला सातव्यांदा मुदत वाढ देण्यात आली आहे. योजनेतंर्गत केंद्र सरकारने दर महिन्याला 80 कोटी गरीब जनतेला पाच किलो गहू आणि तांदळाचा मोफत पुरवठा करते. राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा अधिनियमांतर्गत (NFSA) अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो.

या सरकारी योजनेतंर्गत आतापर्यंत 3.90 लाख कोटी रुपयांहून अधिकचा खर्च आला आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 1,118 लाख टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारने हमीभावावर 2.75 लाख कोटी रुपयांच्या पिकांची खरेदी केली आहे. हा एक विक्रम आहे.

केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या दाव्यानुसार, एक देश, एक राशन कार्ड या महत्वकांक्षी योजनेतंर्गत गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही योजना देशातील 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 80 कोटी लाभार्थ्यांचा समावेश आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?