AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी

Valentine Week : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. काहींना व्हॅलेंटाईनचा शोध घ्यायचा आहे. तर काहींना त्यांचा व्हॅलेंटाईन कधीच मिळाला नाही. प्रत्येकाच्या मनातील हळव्या कोपऱ्यात कोणीतरी असतेच. उद्योगपती रतन टाटा यांची प्रेम कहाणी कधीच पुढे गेली नाही, त्याला कारणं काय असतील?

Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी
| Updated on: Feb 08, 2023 | 6:42 PM
Share

नवी दिल्ली : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. सध्या अनेकांना प्रेमाचे भरते आलेले आहे. काहींना प्रेम मिळते. तर काहींना सर्व सूख लोळण घेत असतानाही प्रेमाची (Love) सोबत मिळत नाही. त्यांच्या मनातील कोपरा हळवाच राहतो. भारतीय उद्योगविश्वातील भीष्म पितामह रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेमाची कथा तुम्हाला माहिती आहे का? रतन टाटा यांना अवघे विश्व ओळखते. रतन टाटा हे यशस्वी उद्योजक, सुस्वभावी, शांत, संयमी आणि त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. पण एवढ्या नोबेल व्यक्तीच्या आयुष्यात एखादी युवराज्ञी (Soulmate) का आली नसेल? त्यांचे लग्न का झाले नसेल? असा सवाल प्रत्येकाच्या मनात येतोच. त्यांचे आयुष्य केवळ नीरस आणि आकडेमोडीचे, रुक्ष, रटाळ तर कधीच नव्हते. या उमद्या मनाच्या, मृदू स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यातही प्रेमाची पहाट उगवली. पण हे प्रेम त्याच्या शेवटला कधीच पोहचू शकले नाही.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातून नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांनी उद्योगात अनेक विक्रम रचले. त्यांच्या व्यावसायिक मुल्यांच्या जपणवणुकीमुळे भारतीय उद्योगात त्यांना आदराने आणि सन्मानाने ओळखले जाते.

एवढे मोठे बिझिनेस टायकून असूनही रतन टाटा यांचे लग्न का नाही झाले असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या हँडसम बिझिनेसमनाच्या प्रेमात कोणी पडलेच नाही, असे झाले नाही. त्यांची प्रेमकथा लग्नापर्यंत कधीच पोहचली नाही. लग्नाची गोष्ट पुढे सरकरलीच नाही.

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमप्रकरणावर अनेकदा दिलखूलासपणे माहिती दिली आहे. रतन टाटा हे एका कंपनीत काम करत असताना लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते. परंतु, 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या प्रेमकहाणीला ब्रेक लागला. त्यांच्या प्रेमात या युद्धाने प्रेम विराम घडला.

या नात्याविषयी रतन टाटा गंभीर होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते. पण नंतर त्यांना भारतात परतावे लागले. काही कारणास्तव त्यांची मैत्रिण काही भारतात येऊ शकली नाही. पुढे युद्धाची माशी शिंकली आणि लग्नाला परवानगी मिळाली नाही. हे प्रेम प्रकरण तिथेच संपले.

रतन टाटा यांना ते अमेरिकेत जातील अथवा त्यांची प्रेयसी भारतात येईल असे वाटत होते. दोघांचे कुटुंब सोबत असतील आणि ते लग्न करतील, असा दोघांचा व्होरा होता. सर्व काही मनासारखं घडत असतानाच भारत-चीन युद्ध सुरु झालं. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबियांनी भारतात येण्यास नकार दिला. त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. रतन टाटा यांचे नाव सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडल्या गेले. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.