AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी

Valentine Week : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. काहींना व्हॅलेंटाईनचा शोध घ्यायचा आहे. तर काहींना त्यांचा व्हॅलेंटाईन कधीच मिळाला नाही. प्रत्येकाच्या मनातील हळव्या कोपऱ्यात कोणीतरी असतेच. उद्योगपती रतन टाटा यांची प्रेम कहाणी कधीच पुढे गेली नाही, त्याला कारणं काय असतील?

Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी
| Updated on: Feb 08, 2023 | 6:42 PM
Share

नवी दिल्ली : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. सध्या अनेकांना प्रेमाचे भरते आलेले आहे. काहींना प्रेम मिळते. तर काहींना सर्व सूख लोळण घेत असतानाही प्रेमाची (Love) सोबत मिळत नाही. त्यांच्या मनातील कोपरा हळवाच राहतो. भारतीय उद्योगविश्वातील भीष्म पितामह रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेमाची कथा तुम्हाला माहिती आहे का? रतन टाटा यांना अवघे विश्व ओळखते. रतन टाटा हे यशस्वी उद्योजक, सुस्वभावी, शांत, संयमी आणि त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. पण एवढ्या नोबेल व्यक्तीच्या आयुष्यात एखादी युवराज्ञी (Soulmate) का आली नसेल? त्यांचे लग्न का झाले नसेल? असा सवाल प्रत्येकाच्या मनात येतोच. त्यांचे आयुष्य केवळ नीरस आणि आकडेमोडीचे, रुक्ष, रटाळ तर कधीच नव्हते. या उमद्या मनाच्या, मृदू स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यातही प्रेमाची पहाट उगवली. पण हे प्रेम त्याच्या शेवटला कधीच पोहचू शकले नाही.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातून नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांनी उद्योगात अनेक विक्रम रचले. त्यांच्या व्यावसायिक मुल्यांच्या जपणवणुकीमुळे भारतीय उद्योगात त्यांना आदराने आणि सन्मानाने ओळखले जाते.

एवढे मोठे बिझिनेस टायकून असूनही रतन टाटा यांचे लग्न का नाही झाले असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या हँडसम बिझिनेसमनाच्या प्रेमात कोणी पडलेच नाही, असे झाले नाही. त्यांची प्रेमकथा लग्नापर्यंत कधीच पोहचली नाही. लग्नाची गोष्ट पुढे सरकरलीच नाही.

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमप्रकरणावर अनेकदा दिलखूलासपणे माहिती दिली आहे. रतन टाटा हे एका कंपनीत काम करत असताना लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते. परंतु, 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या प्रेमकहाणीला ब्रेक लागला. त्यांच्या प्रेमात या युद्धाने प्रेम विराम घडला.

या नात्याविषयी रतन टाटा गंभीर होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते. पण नंतर त्यांना भारतात परतावे लागले. काही कारणास्तव त्यांची मैत्रिण काही भारतात येऊ शकली नाही. पुढे युद्धाची माशी शिंकली आणि लग्नाला परवानगी मिळाली नाही. हे प्रेम प्रकरण तिथेच संपले.

रतन टाटा यांना ते अमेरिकेत जातील अथवा त्यांची प्रेयसी भारतात येईल असे वाटत होते. दोघांचे कुटुंब सोबत असतील आणि ते लग्न करतील, असा दोघांचा व्होरा होता. सर्व काही मनासारखं घडत असतानाच भारत-चीन युद्ध सुरु झालं. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबियांनी भारतात येण्यास नकार दिला. त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. रतन टाटा यांचे नाव सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडल्या गेले. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?