AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी

Valentine Week : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. काहींना व्हॅलेंटाईनचा शोध घ्यायचा आहे. तर काहींना त्यांचा व्हॅलेंटाईन कधीच मिळाला नाही. प्रत्येकाच्या मनातील हळव्या कोपऱ्यात कोणीतरी असतेच. उद्योगपती रतन टाटा यांची प्रेम कहाणी कधीच पुढे गेली नाही, त्याला कारणं काय असतील?

Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी
| Updated on: Feb 08, 2023 | 6:42 PM
Share

नवी दिल्ली : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. सध्या अनेकांना प्रेमाचे भरते आलेले आहे. काहींना प्रेम मिळते. तर काहींना सर्व सूख लोळण घेत असतानाही प्रेमाची (Love) सोबत मिळत नाही. त्यांच्या मनातील कोपरा हळवाच राहतो. भारतीय उद्योगविश्वातील भीष्म पितामह रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेमाची कथा तुम्हाला माहिती आहे का? रतन टाटा यांना अवघे विश्व ओळखते. रतन टाटा हे यशस्वी उद्योजक, सुस्वभावी, शांत, संयमी आणि त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. पण एवढ्या नोबेल व्यक्तीच्या आयुष्यात एखादी युवराज्ञी (Soulmate) का आली नसेल? त्यांचे लग्न का झाले नसेल? असा सवाल प्रत्येकाच्या मनात येतोच. त्यांचे आयुष्य केवळ नीरस आणि आकडेमोडीचे, रुक्ष, रटाळ तर कधीच नव्हते. या उमद्या मनाच्या, मृदू स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यातही प्रेमाची पहाट उगवली. पण हे प्रेम त्याच्या शेवटला कधीच पोहचू शकले नाही.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातून नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांनी उद्योगात अनेक विक्रम रचले. त्यांच्या व्यावसायिक मुल्यांच्या जपणवणुकीमुळे भारतीय उद्योगात त्यांना आदराने आणि सन्मानाने ओळखले जाते.

एवढे मोठे बिझिनेस टायकून असूनही रतन टाटा यांचे लग्न का नाही झाले असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या हँडसम बिझिनेसमनाच्या प्रेमात कोणी पडलेच नाही, असे झाले नाही. त्यांची प्रेमकथा लग्नापर्यंत कधीच पोहचली नाही. लग्नाची गोष्ट पुढे सरकरलीच नाही.

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमप्रकरणावर अनेकदा दिलखूलासपणे माहिती दिली आहे. रतन टाटा हे एका कंपनीत काम करत असताना लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते. परंतु, 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या प्रेमकहाणीला ब्रेक लागला. त्यांच्या प्रेमात या युद्धाने प्रेम विराम घडला.

या नात्याविषयी रतन टाटा गंभीर होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते. पण नंतर त्यांना भारतात परतावे लागले. काही कारणास्तव त्यांची मैत्रिण काही भारतात येऊ शकली नाही. पुढे युद्धाची माशी शिंकली आणि लग्नाला परवानगी मिळाली नाही. हे प्रेम प्रकरण तिथेच संपले.

रतन टाटा यांना ते अमेरिकेत जातील अथवा त्यांची प्रेयसी भारतात येईल असे वाटत होते. दोघांचे कुटुंब सोबत असतील आणि ते लग्न करतील, असा दोघांचा व्होरा होता. सर्व काही मनासारखं घडत असतानाच भारत-चीन युद्ध सुरु झालं. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबियांनी भारतात येण्यास नकार दिला. त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. रतन टाटा यांचे नाव सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडल्या गेले. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.