AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Alert: ‘या’ ग्राहकांना बँकेत जाऊन करावे लागणार हे काम, अन्यथा…

ते नियम न पाळल्यास बँक खाते निष्क्रिय करते, ज्यानंतर बँक खात्यातून कोणताही व्यवहार करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही बँक खात्यातून विशिष्ट वेळेसाठी कोणताही व्यवहार करत नसाल तर बँक ते खाते बंद करते. यानंतर एका प्रक्रियेचे पालन केल्यानंतर ते पुन्हा सक्रिय करावे लागेल.

SBI Alert: 'या' ग्राहकांना बँकेत जाऊन करावे लागणार हे काम, अन्यथा...
SBI Alert
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 11:39 AM
Share

नवी दिल्लीः भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा पुरवते आणि आता बँकिंगचे बहुतेक काम केवळ ऑनलाईन माध्यमातून पूर्ण होत आहे. परंतु यासोबतच बँकेचे अनेक नियम आहेत, जे ग्राहकांना पाळावे लागतात. ते नियम न पाळल्यास बँक खाते निष्क्रिय करते, ज्यानंतर बँक खात्यातून कोणताही व्यवहार करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही बँक खात्यातून विशिष्ट वेळेसाठी कोणताही व्यवहार करत नसाल तर बँक ते खाते बंद करते. यानंतर एका प्रक्रियेचे पालन केल्यानंतर ते पुन्हा सक्रिय करावे लागेल.

तर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुमचे खाते कधी बंद होते आणि एकदा खाते निष्क्रिय झाले की, ते पुन्हा कसे सुरू करावे. जर तुम्ही या प्रक्रियेचे पालन केले नाही, तर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही. एसबीआयच्या या विशेष नियमांबद्दल जाणून घ्या, ज्याकडे प्रत्येक खातेधारकाने लक्ष देणे आवश्यक आहे.

खाते कधी निष्क्रिय होते?

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर बचत किंवा चालू खात्यात दोन वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला गेला नाही, तर त्याला ‘निष्क्रिय’ खात्याच्या श्रेणीत टाकले जाते. जर हे 10 वर्षे राहिले, म्हणजे समजा 10 वर्षे निष्क्रिय खात्यात कोणताही व्यवहार केला गेला नाही, तर त्यात जमा केलेले पैसे आणि त्याचे व्याज शिक्षण आणि जागृती निधीमध्ये हस्तांतरित केले जाते. मात्र, असे करण्याआधी बँक ग्राहकाला त्याची माहितीही देते.

खाते कसे सक्रिय करावे?

एसबीआयने सामायिक केलेल्या माहितीनुसार, खाते पुन्हा ऑपरेटिव्ह करण्यासाठी आपल्याला केवायसी अपडेट करावे लागेल म्हणजेच आपली सर्व केवायसी कागदपत्रे बँकेत जमा करा. याशिवाय ग्राहकाला बँकेत जाऊन डेबिट व्यवहारही करावा लागेल. हे लक्षात ठेवा की हा व्यवहार फक्त बँकेद्वारेच झाला पाहिजे. म्हणून बँकेकडून केवायसी दस्तऐवजासह बँक शाखेला भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे आणि तुम्ही बँक शाखेशीही संपर्क साधू शकता.

सल्ला म्हणजे नेमका काय?

तुमच्याकडे किती खाती आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यांच्यामध्ये काही व्यवहार नियमितपणे करत राहा. त्याच वेळी जर एखादे खाते तुमच्यासाठी अजिबात काम करत नसेल, तर बँकेत जा आणि ते बंद करा आणि निश्चितपणे बँक खात्यात नॉमिनीची माहिती अपडेट ठेवा.

संबंधित बातम्या

सप्टेंबर महिन्यात ‘या’ 5 बँकांच्या FD मधल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा, जाणून घ्या सर्वकाही

पगार ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ज्याद्वारे तुम्ही बँकेतून जास्त पैसे काढू शकता

sbi alert if you want to active your account then have to kyc update in bank branch

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.