AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिझेल वाहनांच्या अजूनही प्रेमात? पण वाचली की खास समितीची ही शिफारस, Diesel वाहने होणार लवकरच बंद? डेडलाईन जाहीर

Diesel Vehicles Ban : देशात डिझेल वाहनांवर सरकारची वक्रदृष्टी असल्याचे अनेक वक्तव्यातून समोर आले आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सरकारच्या या समितीने पण डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केलेली आहे. काय आहे या समितीची डेडलाईन?

डिझेल वाहनांच्या अजूनही प्रेमात? पण वाचली की खास समितीची ही शिफारस, Diesel वाहने होणार लवकरच बंद? डेडलाईन जाहीर
डिझेल वाहनं बंद होणार?
| Updated on: Oct 11, 2024 | 11:29 AM
Share

भारतात माल आणि प्रवाशी वाहतुकीसाठी डिझेल वाहनाचा मोठा वापर करण्यात येतो. जगभरात ग्लोबल वार्मिंगची समस्या वाढत आहे. त्यावर प्रत्येक देश सध्या गांभिर्याने विचार करत आहे. देशातही मोदी सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत. डिझेल वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचा दावा करण्यात येतो. त्यामुळे सरकारच्या खास समितीने डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. काय दिली आहे या समितीने अंतिम तारीख?

तरुण कपूर यांच्या समितीची शिफारस काय?

तरुण कपूर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीची (Energy Transition Advisory Committee) स्थापना केली होती. या समितीने अभ्यासाअंती एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, भारतात 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर बंद आणण्याची सूचना केलेली आहे. केंद्र सरकारने हरित आणि स्वच्छ उर्जेवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस सुद्धा समितीने केली आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची शिफारस समितीने केली आहे. अर्थात केंद्र सरकारने अद्याप या शिफारसी स्वीकारल्या नाहीत आणि अधिकृतपणे त्यावर काही भाष्य केलेले नाही.

नवीन डिझेल कार खरेदी तोट्याची?

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल कार पूर्णपणे बंद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण सरकारने या बजेटमध्ये पेट्रोल अथवा डिझेल कारवर कर वाढवलेला नाही. सरकार पेट्रोल आणि डिझेल कार बंद करण्यावर विचार करत आहे. पण त्यासाठी अगोदर पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी, हायड्रोजन, इथेनॉल वाहनांची स्वस्त निर्मितीवर भर देण्यात येत आहे. एका कारचे आयुष्य साधारणतः 10-15 वर्षांचे असते. स्क्रॅप पॉलिसीत या कार मोडतात.

गेल्या दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला FAME अंतर्गत सरकारने प्रोत्साहन दिले आहे. सबसिडी दिली आहे. आता दुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची निर्मिती वाढली आहे. या कार 5 ते 6 लाखांच्या टप्प्यात आल्या तर मोठा फायदा होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चार्जिंग स्टेशनची उपलब्धता असणे गरजेचे आहे. तसेच कार चार्जिंगला कमी कालावधी लागल्यास मोठा फायदा होईल.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.