AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आतापर्यंत तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका
शेअर बाजार
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 11:25 AM
Share

मुंबई –  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आतापर्यंत तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी शेअरबाजार सुरू होताच सेंसेक्स 650 अंकांनी खाली आल्याचे पहायाला मिळाले. सध्या स्थितीमध्ये 633 अंकाच्या घसरणीसह  सेंसेक्स 59,002.62  अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 155 अंकांनी घसरून 17610 वर पोहोचली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देखील जागतिक स्तरावर शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावर होते. जगातील सर्व प्रमुख शेअर मार्केट  हे घसरणीसह बंद झाले. त्याचा फटका आज सोमवारी देखील बसल्याचे पहायला मिळत आहे.

केवळ चार कंपन्यांचे शेअर तेजीत 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअरबाजामध्ये केवळ 4 कंपन्यांच्या शेअर्समध्येच तेजी दिसून आली तर तब्बल 26 शेअर हे धोक्याच्या पातळीवर कारभार करत होते. भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पावरग्रिड आणि टीसीएस या चार कंपन्यांच्याच शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर उर्वरीत 26 शेअर्सला मंदीचा फटका बसला. रिलायंस इंडस्ट्रीज, टायटन, मारूती, एसबीआय, एचडीएफसी बँक यांच्या  शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली.

गुंतवणूकदारांचे नुकसान 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट 650 अंकांनी कोसळल्याने गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदाराचे 5.40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप शुक्रवारी 2,69,20,196.99 कोटी रुपये इतकी होती. सोमवारी शेअर मार्केट गडगडल्याने त्यामध्ये घट होऊन ती 2,63,78,463.38  कोटी रुपयांवर  पोहोचली आहे.

भारती एअरटेल टॉपवर 

आपल्या सर्व प्रिपेड प्लॅनचे दर वाढवण्याचा निर्णय भारती एअरटेलने घेतला आहे. येत्या 26 तारखेपासून एअरटेलचे सर्व प्लॅन हे 20 ते 25 टक्क्यांनी महागणार आहेत. याबाबत रविवारी कंपनीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा कंपनीला होताना दिसून येत असून, कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. सध्या स्थितीमध्ये भारती एअरटेलच्या शेअरची किंमत प्रति शेअर 756 इतकी झाली आहे.

संबंधित बातम्या 

कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर काय होणार परिणाम?

भारती एअरटेलचा ग्राहकांना झटका; प्रिपेड प्लॅनचे दर वाढवले, महिन्याला मोजावी लागणार ‘इतकी’ किंमत

Follow Us
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?