AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आतापर्यंत तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका
शेअर बाजार
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 11:25 AM
Share

मुंबई –  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आतापर्यंत तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी शेअरबाजार सुरू होताच सेंसेक्स 650 अंकांनी खाली आल्याचे पहायाला मिळाले. सध्या स्थितीमध्ये 633 अंकाच्या घसरणीसह  सेंसेक्स 59,002.62  अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 155 अंकांनी घसरून 17610 वर पोहोचली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देखील जागतिक स्तरावर शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावर होते. जगातील सर्व प्रमुख शेअर मार्केट  हे घसरणीसह बंद झाले. त्याचा फटका आज सोमवारी देखील बसल्याचे पहायला मिळत आहे.

केवळ चार कंपन्यांचे शेअर तेजीत 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअरबाजामध्ये केवळ 4 कंपन्यांच्या शेअर्समध्येच तेजी दिसून आली तर तब्बल 26 शेअर हे धोक्याच्या पातळीवर कारभार करत होते. भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पावरग्रिड आणि टीसीएस या चार कंपन्यांच्याच शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर उर्वरीत 26 शेअर्सला मंदीचा फटका बसला. रिलायंस इंडस्ट्रीज, टायटन, मारूती, एसबीआय, एचडीएफसी बँक यांच्या  शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली.

गुंतवणूकदारांचे नुकसान 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट 650 अंकांनी कोसळल्याने गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदाराचे 5.40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप शुक्रवारी 2,69,20,196.99 कोटी रुपये इतकी होती. सोमवारी शेअर मार्केट गडगडल्याने त्यामध्ये घट होऊन ती 2,63,78,463.38  कोटी रुपयांवर  पोहोचली आहे.

भारती एअरटेल टॉपवर 

आपल्या सर्व प्रिपेड प्लॅनचे दर वाढवण्याचा निर्णय भारती एअरटेलने घेतला आहे. येत्या 26 तारखेपासून एअरटेलचे सर्व प्लॅन हे 20 ते 25 टक्क्यांनी महागणार आहेत. याबाबत रविवारी कंपनीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा कंपनीला होताना दिसून येत असून, कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. सध्या स्थितीमध्ये भारती एअरटेलच्या शेअरची किंमत प्रति शेअर 756 इतकी झाली आहे.

संबंधित बातम्या 

कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर काय होणार परिणाम?

भारती एअरटेलचा ग्राहकांना झटका; प्रिपेड प्लॅनचे दर वाढवले, महिन्याला मोजावी लागणार ‘इतकी’ किंमत

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?