AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचत सोडा, सलग तिसऱ्या वर्षी कर्जावरच सर्व कारभार

India Debt : कोरोनानंतर देशात जगण्यासाठी मोठी लढाई सुरु आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता एका आकडेवारीनुसार, बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी वाढले आहे तर बँकेत ठेवी ठेवणाऱ्यांची संख्या सातत्याने घसरत आहे.

बचत सोडा, सलग तिसऱ्या वर्षी कर्जावरच सर्व कारभार
कर्ज चढले डोईवर, बचत तर काही होईना
| Updated on: Apr 10, 2024 | 3:35 PM
Share

महागाईने भारतीयांच्या आयुष्यातील आनंद हिरावला गेला आहे. या 10 वर्षांत विशेषतः कोरोनानंतर दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू कित्येक पट्टीने वाढल्या आहेत. महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जगण्यासाठी पण अनेकांन कर्ज काढावे लागत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीयांच्या आर्थिक सवयी बदलल्याचे समोर आले आहे. भारतीय कुटुंबिय पूर्वी बचतीवर भर देत होते. पण आता त्यांना कर्ज काढावे लागत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत बचती करणाऱ्यांपेक्षा कर्ज घेणाऱ्यांचा आकडा वाढल्याचे दिसून आले आहे.

भारतीयांनी केली इतकी बचत

मोतीलाल ओसवाल फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या इकोस्कोपच्या अहवाला आधारे बिझनेस स्टँडर्डने एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, गेल्या तीन वर्षांत भारतीय कुटुंबिय बँकेत पैसा जमा करण्याऐवजी बँकेकडून उधार घेत आहेत. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या 9 महिन्यात म्हणजे एप्रिल ते डिसेंबर 2023 या दरम्यान भारतीयांनी जी रक्कम बँकांमध्ये जमा केली ती देशाच्या जीडीपीच्या 4.5 टक्के इतकी आहे.

9 महिन्यात घेतले इतके कर्ज

या अहवालानुसार, एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान भारतीयांनी बँकांमध्ये जीडीपीच्या 4.9 टक्के कर्ज घेतले आहे. म्हणजे भारतीयांची बचतीची सवय कमी होऊन कर्ज घेण्याची सवय वाढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा ट्रेंड सुरु आहे. ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कर्ज घेण्याचा रेकॉर्ड

भारतीय कुटुंबियांच्या एकूण कर्जाच आकडा पाहता आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचा अंदाज येतो. या अहवालानुसार, डिसेंबर 2023 मध्ये भारतीय कुटुंबावर बँकेचे एकूण कर्ज वाढले आहे. कर्ज घेण्याचे प्रमाण विक्रम स्तरावर पोहचले आहे. एकूण कर्ज जीडीपीच्या 40 टक्क्यांवर पोहचले आहे. तर बचत करण्याचे प्रमाण सर्वकालीन निच्चांकावर आले आहे.

या कारणांमुळे कर्जाचा वाढता डोंगर

मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, भारतीय कुटुबांची बँकेतील ठेव दिवसागणिक कमी होत आहे. तर कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे उत्पन्नाचे प्रमाण कमी, दैनंदिन वस्तूंची महागाई हे एक आहे. अनेक जण बँकेत बचत करण्याऐवजी, ठेव ठेवण्याऐवजी हा पैसा म्युच्युअल फंड, शेअर बाजाराकडे वळवत आहे. त्यामुळे पण ठेवीचे आकडे कमी झाले आहेत.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.