AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहले आप! टाटामध्ये आता ‘महिला राज’; टाटाच्या सर्वात मोठ्या फॅक्ट्रीत किती महिलांची भरती होणार माहित्ये?

सध्या टाटाच्या 500 एकरावरील या प्लांटमध्ये तब्बल 10 हजार कर्मचारी काम करतात. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. सप्टेंबरमध्ये या प्लांटमध्ये 5 हजार महिलांना नोकरी देण्यात आली होती.

पहले आप! टाटामध्ये आता 'महिला राज'; टाटाच्या सर्वात मोठ्या फॅक्ट्रीत किती महिलांची भरती होणार माहित्ये?
टाटाच्या सर्वात मोठ्या फॅक्ट्रीत किती महिलांची भरती होणार माहित्ये?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2022 | 12:32 PM
Share

नवी दिल्ली: महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच टाटा फॅक्ट्रीत (Tata Group) महिलांचं राज्य अवतरणार आहे. कारण टाटा ग्रुपने आपल्या फॅक्ट्रीत 45 हजार महिलांची (women workers) भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांना देशातील सर्वात मोठ्या उद्योगात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तामिळनाडूच्या (tamilnadu) होसूर जिल्ह्यात टाटाने इलेक्ट्रॉनिक कारखान्यात कर्मचारी संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन वर्षात 45 हजार महिलांची भरती करण्यात येणार आहे.

टाटाची होसूरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स तयार करण्याची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीत आयफोनचे पार्ट्स तयार केले जातात. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, कोरोनामुळे चीनमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अॅप्पलचं उत्पादन थांबलं आहे. त्यामुळे भारताने आयफोनच्या उत्पादनावर भर दिला आहे.

टाटा ग्रुपने अॅप्पलकडून अधिकाधिक ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे येत्या 18 ते 24 महिन्यात टाटामध्ये 45 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक नोकर भरती ही महिलांची करण्यात येणार आहे.

दरम्यान, सध्या टाटाच्या 500 एकरावरील या प्लांटमध्ये तब्बल 10 हजार कर्मचारी काम करतात. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. सप्टेंबरमध्ये या प्लांटमध्ये 5 हजार महिलांना नोकरी देण्यात आली होती. रिपोर्टनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना 16000 रुपयाहून अधिक पगार देण्यात येत आहे.

तसेच कर्मचाऱ्यांना फॅक्ट्रीत भोजनाची व्यवस्था असून त्यांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. तसेच या कामगारांना प्रशिक्षण आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची तयारीही टाटा ग्रुपने सुरू केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.