AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata : मुकेश अंबानींनतर टाटा ग्रुप पण या व्यवसायात टाकणार पाऊल..उघडणार 20 स्टोअर..

Tata : मुकेश अंबानीनंतर टाटा समूह ही या व्यवसायात उडी घेण्याच्या तयारीत आहे..

Tata : मुकेश अंबानींनतर टाटा ग्रुप पण या व्यवसायात टाकणार पाऊल..उघडणार 20 स्टोअर..
टाटा या क्षेत्रात अजमावणार नशीबImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 18, 2022 | 11:10 PM
Share

नवी दिल्ली : मीठापासून ते विमान व्यवसायापर्यंत टाटा समूहाचा(Tata Group) प्रत्येक व्यवसायात दबदबा आहे. आता टाटा समूहाने या व्यवसायात उडी घेण्याची तयारी केली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यापूर्वीच या व्यवसायात (Business) नशीब आजमाविण्याची घोषणा केली आहे.

Tata Group आता कॉस्मेटिक व्यवसायात उतरणार आहे. 18 ते 45 वयोगट हा टाटा समूहाचे टार्गेट राहणार आहे. या क्षेत्रात LVMH Sephora आणि Nykaa या ब्रँडचे मोठे आव्हान या ग्रुपसमोर असेल.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, देशातील 157 वर्षांहून अधिक जूने व्यावसायिक कुटुंब, टाटा समूह ब्युटी टेक क्षेत्रात पाऊल टाकत आहे. टाटा देशभरात जवळपास 20 ब्यूटी टेक आऊटलेट्स (Beauty Tech Outlets) उघडण्याची तयारी करत आहे.

यासंबंधी समूहाची परदेशातील ब्रँडशी चर्चा सुरु आहे. जगातील दुसऱ्या सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात ब्यूटी आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स बाजार तेजीत आहे. सध्या भारतातील हा बाजार 16 अरब डॉलर इतका झाला आहे.

बिझनेस टुडेमध्ये रॉयटर्सचा एक अहवाल छापण्यात आला आहे.त्यानुसार टाटा समूह ब्युटी अँड पर्सनल केअरमध्ये पाऊल टाकत आहे. 18 ते 45 वयोगट हा टाटा समूहाचे टार्गेट राहणार आहे.

सौंदर्य प्रसाधन आणि सेवेच्या जगतात जोरदार पुनरागमन करण्यासाठी टाटा समूह The Honest Company, Ellis Brooklyn आणि Gallinee यासारख्या ब्रँडशी करार करण्याच्या तयारीत आहे.

टाटाच नाहीतर त्याअगोदर रिलायन्स इंडस्ट्रीजनेही या क्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स ब्युटी अँड कॉस्मेटिक जगतात ठसा उमटविण्यासाठी तयार आहे. रिलायन्स या उद्योगात 400 रिटेल स्टोअर्स सुरु करण्याच्या तयारीत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.