नवी दिल्ली : बटाटे (Potato), टमाटे (Tomato) आणि कांदा हा स्वयंपाक घरातील रोजचा अत्यावश्यक घटक आहे. सध्या भाजीपाल्याच्या (Vegetable) किंमती वाढल्या आहेत. त्यात टमाटे, बटाटे आणि कांद्याच्या भाव वाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहे. त्यातच टमाट्याचे उत्पादन 4 टक्के आणि बटाट्याचे उत्पादन 5 टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) व्यक्त केला.