AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही उद्योगपती, व्यापारी नाही’, Ratan Tata यांनी धनदांडग्यांना असा शिकवला धडा, नफ्याच्या लालसेत चांगुलपणा न विसरण्याचा दिला मंत्र

Ratan Tata Valuable Advice : रतन टाटा हे भारतीय उद्योग जगतातील पितृतुल्य व्यक्तिमत्व. आज अनेक तरुण, नवउद्योजकांचे ते हिरो आहेत. त्यांच्या आदर्श विचारावर चालण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. रतन टाटा स्वतःला एक उद्योजकच मानत होते. त्यांची साधी राहणी आणि समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

'आम्ही उद्योगपती, व्यापारी नाही', Ratan Tata यांनी धनदांडग्यांना असा शिकवला धडा, नफ्याच्या लालसेत चांगुलपणा न विसरण्याचा दिला मंत्र
रतन टाटा यांचा महत्त्वाचा धडा
| Edited By: | Updated on: Oct 10, 2024 | 12:41 PM
Share

व्यापारी हा नेहमी पैशांच्या मागे धावतो, त्याला नफा कमवायचा असतो. तर उद्योजकाला नफ्यापेक्षा लोकांच्या भल्याचा विचार असतो. हे सांगण्याचे कारण म्हणजे, काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात रतन टाटा यांनी व्यापारी आणि उद्योजकामधील अंतर समजावून सांगितले होते. ‘आम्ही उद्योगपती, व्यापारी नाही, त्यामुळे नफा हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. आमच्यासाठी देश आणि समाजाचं कल्याण महत्त्वाचं आहे’, असे विचार त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही. आज रतन टाटा आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांचा मोठा वारसा ते आपल्याकडे ठेवून गेले आहेत. त्यांनी असे धडे शिकवले की त्यातून एक चांगला समाज घडू शकतो.

रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त होत आहे. त्यांना अत्यंत जवळून पाहणाऱ्यांना त्यांचं साध राहणीमान भावलं. मोठे गुंतवणूकदार वल्लभ भंसाली यांनी CNBC आवाजाशी बोलताना सांगितले की रतन टाटा हे नेहमी दूरचा विचार करत होते. छोट्या छोट्या नफ्याकडे लक्ष न देता काही तरी धोरण आखून त्यावर काम करत असत. त्यांनी रतन टाटा यांचा हा किस्सा त्यावेळी सांगितला. आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही. आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील, जे येत्या काही वर्षात देश आणि समाजाला मोठा लाभ पोहचवतील. त्यांना लाभ होईल. आपल्याला व्यापाऱ्याप्रमाणे छोट्या-मोठ्या लाभाकडे लक्ष्य देण्याची गरज नाही, असे टाटा म्हणाल्याची आठवण त्यांनी जागवली.

नफा नाही, पुढची दृषी समोर ठेवा

उद्योगपती आणि व्यापारी यांच्यामधील अंतर काय हे रतन टाटा यांनी समजावून सांगितले. ते केवळ उदाहरण देऊन थांबले नाहीत. तर 1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष पदी असताना एक खास धोरण राबवले. त्यांनी मोठ्या उद्योगात अनेक बदल केले. त्याचा पुढे देशाला फायदा झाला. उद्योगात जोखीम घ्यायला ते कधी कचरले नाहीत. त्यांनी नव उद्योजकांना जोखीम घेण्यास सांगितले. रतन टाटा यांनी अनेक जागतिक कंपन्यांचे अधिग्रहण करताना हीच दूरदृष्टी उपयोगात आणली.

सर्वसामान्यांच्या चारचाकीचे स्वप्न साकार

प्रत्येक भारतीयाकडे स्वतःची कार असावी असे स्वप्न रतन टाटा यांनी उराशी बाळगले होते. त्यांनी त्यातूनच 2008 मध्ये नॅनो कारचे स्वप्न पूर्ण केले. त्या प्रकल्पात नफातोट्याचे गणित त्यांनी पाहिलेच नाही. त्यांचे एकच स्वप्न होते की सर्वसामान्यांसाठी एक किफायतशीर कार असावी. ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी उद्योगातील 60 टक्के भाग टाटा ट्रस्टला देण्याचे धोरण स्वीकारले होते.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक