AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाऊक महागाईच्या दरात पुन्हा वाढ; अन्नधान्य, भाजीपाला सर्वच गोष्टी महागल्या

देशात महागाई वाढतच चालली आहे. घाऊक महागाईच्या दरात गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 1.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. ठोक महागाई 12.54  टक्क्यांवरून थेट 14.2 टक्क्यांवर पोहोचली आहे.

घाऊक महागाईच्या दरात पुन्हा वाढ; अन्नधान्य, भाजीपाला सर्वच गोष्टी महागल्या
महागाई दरात मोठी वाढ
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 1:37 PM
Share

नवी दिल्ली : November WPI Inflation Data देशात महागाई वाढतच चालली आहे. घाऊक महागाईच्या दरात गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 1.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. ठोक महागाई 12.54  टक्क्यांवरून थेट 14.2 टक्क्यांवर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेल आणि विजेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे महागाईवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या महागाई गेल्या 12 वर्षांतील उच्चस्थरावर आहे. सप्टेंबरमध्ये ठोक महागाईचा दर 10.66 टक्के होता, त्यामध्ये वाढ होऊन तो ऑक्टोबरमध्ये 12.54 टक्क्यांवर पोहोचला तर नोव्हेंबरमध्ये 14.2 टक्क्यांवर पोहचला आहे.

अन्नधान्याच्या किमतीत वाढ 

मंगळवारी जाहीर झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार अन्न-धान्य आणि खाण्या पिण्याच्या गोष्टींमध्ये 3.06 टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधन पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीमध्ये देखील वाढ होऊन महागाईचा दर 37.18 टक्क्यांवरून 39.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच भाजीपाल्याच्या ठोक किमतीमध्ये 1.68 टक्क्यांची वाढ झाली आहे. धातू आणि इतर गोष्टींचे देखील भाव वाढले आहेत. अनेक वस्तूंचा कच्चा माल वाढल्याने वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न

दरम्यान सरकारकडून महागाईवर नियंत्रण मिळवण्याच प्रयत्न सुरू आहे. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत बोलताना सांगितले की, केंद्र आणि आरबीआयकडून महागाईचा दर कसा नियंत्रित राहिल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या चार नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले. दरम्यान भविष्यात देखील महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्ट्रीकोणातून मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या 

देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले; अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका, ग्रामीण भागातील तरुणांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर

अन्न, निवारा महागला, वस्त्रांच्याही किंमती वाढणार; सर्वसामान्यांना दरवाढीचा मोठा फटका

बीडी, काडी, सिगारेट महागणार, जीएसटीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव, झळ किती बसणार?

Follow Us
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?.
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?.
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!.
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.