AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : शेअर बाजाराची काय राहील चाल, हे शेअर दाखवतील चमक, या घडामोडींचा होईल परिणाम

Share Market : पुढील आठवड्यात शेअर बाजाराची चाल काय राहील, शेअर बाजारात कोणत्या घटकांचा, घटनांचा परिणाम होईल. शेअर बाजारात कोणते स्टॉक चमकणार, कुठे होईल फायदा, बसेल का फटका

Share Market : शेअर बाजाराची काय राहील चाल, हे शेअर दाखवतील चमक, या घडामोडींचा होईल परिणाम
| Updated on: Apr 02, 2023 | 8:49 PM
Share

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात शेअर बाजार (Share Market) कोणता राग आवळेल? तुमचा काय होईल फायदा, काय बसेल फटका. पुढील आठवड्यात सुट्यांमुळे शेअर बाजारात जास्त दिवस कामकाज होणार नाही. केवळ तीन दिवस शेअर बाजारात काम होणार आहे. आरबीआयचे महागाई (Inflation) धोरण शेअर बाजारावर मोठा परिणाम करु शकते. बाजारातील तज्ज्ञानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे रेपो दरात वाढ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेसह युरोपमधील घाडमोडींचा मोठा परिणाम होऊ शकतो. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) बाजाराची दिशा ठरवतील. मंगळवारी महावीर जयंती आणि शुक्रवारी गुड फ्रायडेमुळे बाजाराला सुट्टी राहील.

ऑटो कंपन्यांचे स्टॉक करतील कमाल बाजारातील तज्ज्ञानुसार, गुंतवणूकदारांचे लक्ष एफपीआय आणि घरगुती संस्थागत गुंतवणूकदारवर असेल. एफपीआय आता शुद्ध खरेदीदार झाले आहेत. बाजाराचे लक्ष आरबीआयच्या धोरणाकडे आहे. पतधोरण समितीची बैठक तीन दिवस होत आहे. त्यात रेपो दर किती वाढतो, यावर बाजार प्रतिक्रिया जरुर नोंदवेल. यंदा वाहन विक्री जोरदार झाली आहे. मारुती सुझुकी, हुंदायी आणि टाटा मोटर्सने गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक विक्री झाली. वाहन उद्योगने चांगले प्रदर्शन केले आहे.

ही आकडेवारी करेल परिणाम येत्या आठवड्यात जास्त सुट्या आहेत. मॅक्रो इकॉनॉमिक आघाडीवर, उत्पादन पीएमआय आणि सेवा पीएमआय डेटा 3 आणि 5 एप्रिल रोजी जाहीर होईल. 6 एप्रिल रोजी पतधोरण समितीच्या बैठकीच्या निकालाचा परिणाम बाजारावर दिसून येईल. परदेशी गुंतवणूकदारांचा परिणाम पण दिसून येईल.

शुक्रवारी काय होती दिशा गेल्या आठवड्यात बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,464.42 अंकांनी अथवा 2.54 टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी सेन्सेक्स 1,031.43 अंकांच्या अथवा 1.78 टक्क्यांच्या वाढीसह 58,991.52 वर बंद झाला. येत्या आठवड्यात भविष्यात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे बाजाराचे लक्ष असेल. गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना फायदा झाला. शुक्रवारी आशिया, युरोप आणि अमेरिकेतील बाजार फायद्यात बंद झाले होते.

पीएसयु सेक्टरची जोरदार सलामी केवळ खासगी कंपन्यांच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांनी (PSU stock) पण गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्या चांगला परतावा देतात. पण पीएसयू शेअर्सनी त्यांना सुरक्षित गुंतवणुकीसह त्यांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून, 2011 पासून या कंपन्यांनी लाभांश दिला आहे. काही पीएसयू स्टॉक्सने तर 32 वेळा लाभांश दिला आहे. जोरदार परतावा, सरकारी कंपनी, लाभांश असा हा कमाईचा पॅटर्न अनेक वर्षांपासून सुरु आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.