AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : राज्यपालांच्या हस्ते करोनाकाळात इनोव्हेशन करणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्यमींचा सत्कार

करोना काळात विविध क्षेत्रांमध्ये इनोव्हेशन करून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या इनोव्हेटीव्ह उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘इम्पॅक्ट क्रिएटर्स अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.

Mumbai : राज्यपालांच्या हस्ते करोनाकाळात इनोव्हेशन करणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्यमींचा सत्कार
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 18, 2021 | 8:12 PM
Share

मुंबई : एकविसावे शतक भारताचे असेल आणि देशातील युवा नवोन्मेषक हे परिवर्तन घडवून आणतील असे सांगताना इनोव्हेशन विनाशकारी नसावे तर ते संरचनात्मक, मानवतेच्या कल्याणासाठी असावे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत. करोना काळात विविध क्षेत्रांमध्ये इनोव्हेशन करून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या इनोव्हेटीव्ह उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘इम्पॅक्ट क्रिएटर्स अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

इनोव्हेशनला ज्ञान, अध्यात्माची जोड द्या

या कार्यक्रमाचे आयोजन ‘बिलेनियम डिवाज’ या महिला उद्योजिकांच्या संस्थेने केले होते. कार्यक्रमाला भारत सरकारचे मुख्य नवोन्मेषन अधिकारी डॉ अभय जेरे, बिलेनियम डिवाज संस्थेच्या अध्यक्षा श्वेता शालिनी, संचालक भावेश कोठारी, सहसंचालिका मीनल कोठारी आणि दीपिका सिंह उपस्थित होते. विज्ञान व तंत्रज्ञानातील स्थित्यंतरे अतिशय गतीने होत असून पूर्वी परवलीचा शब्द असलेला संशोधन हा शब्द मागे पडून नॅनोतंत्रज्ञान आणि अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द परवलीचे झाले आहेत असे सांगताना विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनला भारतीय ज्ञान, अध्यात्माची जोड दिली तर इनोव्हेशनचे कार्य अधिक शाश्वत आणि हितकर होईल असे राज्यपालांनी सांगितले.

नवी शिक्षण प्रणाली ‘रँछो’ निर्माण करणारी असावी

चीन, अमेरिकेनंतर भारत ही जगातील तिसरी मोठी इनोव्हेशन प्रणाली म्हणून उदयास आली आहे. मात्र बौद्धिक मालमत्ता नोंदणीच्या बाबतीत भारत फार मागे आहे. चीन दरवर्षी 15 लाख पेटंट नोंदवित आहे तर भारत केवळ पन्नास हजार नोंदवित असल्याचे नमूद करून भारतीय शिक्षण प्रणालीने इनोव्हेशन करणारे ‘रँछो’ निर्माण केले पाहिजे, असे भारत सरकारचे मुख्य इनोव्हेशन अधिकारी डॉ, अभय जेरे यांनी यावेळी सांगितले. भारतात 40,000 शिक्षण संस्था असून अंशी टक्क्यांहून अधिक संस्थांनी आजवर एकही पेटंट नोंदविले नाही, ही चिंतेची बाब असल्याचे सांगताना भारताला जगद्गुरू करायचे असेल तर जागतिक स्तरावर परिणाम करू शकतील अश्या नवकल्पना निर्माण कराव्या लागतील, असे जेरे यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी आर्थिक समावेशन, संशोधन, आरोग्य, सेवा, उद्योग आदी क्षेत्रातील 35 नवोन्मेषकांचा आणि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य अधिकारी आशिष चौहान, बिर्ला समूहाच्या नीरजा बिर्ला, डॉ बत्रा क्लिनिकचे डॉ अक्षय बत्रा, डॉ राधाकृष्णन पिल्लई आदींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Beed : ही निवडणूक काळी निवडणूक, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

Mumbai : 9 वर्षात 7.58 लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Follow Us
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली