AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षा महाराष्ट्रासाठी, सेंटर उत्तर प्रदेश ! आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यांच्या प्रेवशपत्रांवर तसे नमूद करण्यात आहे. परीक्षा ही माहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र परिक्षार्थांनी परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशातील मिळाले आहे.

परीक्षा महाराष्ट्रासाठी, सेंटर उत्तर प्रदेश ! आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 8:16 PM
Share

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीये. येत्या 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि ड संवर्गाची परीक्षा होणार आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रेवशपत्रावर तसे नमूद करण्यात आहे. परीक्षा ही माहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र परिक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशातील मिळाले आहे. सरकारच्या या अजब कारभारामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे. (maharashtra health department recruitment student got uttar pradesh exam center on his admit card)

विद्यार्थ्याला थेट उत्तर प्रदेशचे परीत्रा केंद्र 

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी 25 सप्टेंबर आणि गट ड संवर्गातील पदासाठी 26 सप्टेंबर 2021 रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे प्रवेशपत्रदेखील वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र दत्ता पतुरकर या परीक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेश राज्यातील मिळाले आहे. हा अजब प्रकार समोर आल्यामुळे परीक्षेआधी योग्य ते नियोजन करावे, तसेच माझी अडचण दूर करावी अशी मागणी दत्ता पतुरकरकडून केली जात आहे.

भूलथापांना बळी पडू नये

तर दुसरीकडे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. सह्याद्री विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ. साधना तायडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी यांना सूचना

राज्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष घालावे. परीक्षा जरी बाह्यस्त्रोताद्वारे घेतली जात असली तरीही सर्व जिल्हाधिकारी यांनीही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लक्ष द्यावे अशा सूचना टोपे यांनी दिल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये काही व्यक्ती परीक्षेबाबत गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पहावे, असेही टोपे यांनी पोलीस विभागाला सांगितले आहे.

उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये

उमेदवारांनी प्रामाणिकपणे अभ्यास करुनच परीक्षेस उपस्थित राहावे. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागामार्फत संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, असे टोपे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे.

सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा

दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

इतर बातम्या :

‘दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल’, नाना पटोलेंचा खोचक टोला

संतापजनक! आधी त्यानं मुलीचा गळा चिरला, नंतर थेट पोलीस ठाण्यात गेला, महाराष्ट्र हादरला

Video | फूड डिलिव्हरी करणाऱ्या ड्रोनवर कावळ्याचा हल्ला, हवेतील युद्ध कॅमेऱ्यात कैद

(maharashtra health department recruitment student got uttar pradesh exam center on his admit card)

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.