AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात? मग थेट करा संरक्षण दलात नोकरी, मोठी बंपर भरती सुरू, थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. थेट बारावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

बारावी पास आहात? मग थेट करा संरक्षण दलात नोकरी, मोठी बंपर भरती सुरू, थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी
| Updated on: Dec 24, 2023 | 12:33 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 400 जागांसाठी होत आहे. विविध पदांसाठी ही भरती होत आहे. बारावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ही एकप्रकारे मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. संघ लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अ‍ॅकॅडमीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच भरतीसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांना या भरतीसाठी परीक्षा ही देखील द्यावी लागणार आहे. 21 एप्रिल 2024 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. Union Public Service Commission च्या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल. साईटवर जाऊनच या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला अर्ज देखील करावा लागणार आहे.

लष्कर 208, हवाई दल 120, नौदल 42, नौदल अकॅडमी 30 याप्रमाणे ही भरती पार पडणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. बारावी पास असलेल्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी आणि ओपनमध्ये असलेल्या उमेदवारांना 100 रूपये फिस ही भरावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवाराने हे व्यवस्थित तपासावे की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. खरोखरच बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. मग उशीर न करता झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.