AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

mega bharti 2023 : पोलीस, जिल्हा परिषद, तलाठीनंतर आता या विभागात मोठी भरती

sarkari naukri : राज्यात विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु आहे. यामुळे राज्यातील तरुणांना सरकारी नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. आता आणखी एक संधी युवकांना मिळणार आहे.

mega bharti 2023 : पोलीस, जिल्हा परिषद, तलाठीनंतर आता या विभागात मोठी भरती
| Updated on: Aug 21, 2023 | 12:02 PM
Share

योगेश बोरसे, पुणे | 21 ऑगस्ट 2023 : देशाचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता झाली. अमृत महोत्सवी वर्षामुळे राज्य सरकारने मागील वर्षी मोठा निर्णय घेतला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या स्वतंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे राज्यातही 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या भरती प्रक्रियेसंदर्भात पोलीस भरती, तलाठी भरती अन् जिल्हा परिषद भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आता आणखी एक विभागात शंभर टक्के पदे भरण्यात येणार आहे.

किती जागांची भरती होणार

राज्यातील विविध विभागात शासकीय कर्मचाऱ्यांची भरती अनेक वर्षांपासून रखडली होती. यामुळे राज्यातील रिक्त पदांची संख्या सुमारे 2 लाख 44 हजार 405 वर गेली आहे. राज्यातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत तब्बल 23 टक्के पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने विविध विभागांत 75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला. पोलीस, जिल्हा परिषद, तलाठीनंतर आता आरोग्य विभागाचा क्रमांक आला आहे. राज्यात लवकरच आरोग्य विभागात 14 हजार जागांची भरती होणार आहे. राज्यातील 75 हजार जागा भरतीसंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जानेवारी महिन्यात काढले होते.

कोण राबवणार प्रक्रिया

आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया खासगी कंपनीकडे देण्यात येणार आहे. टीसीएस कंपनीमार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. आरोग्य विभागातील सगळ्या आस्थापनेवरील 100 टक्के पदे भरण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रीया पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला दिला आहे.

पेपरची वेळ बदली

राज्यातील जिल्हा परिषदेत 19,460 हजार जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. पोलीस भरतीसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारांची लेखी आणि शारीरिक चाचणी झाली आहे. तलाठी भरतीचे पेपर सध्या राज्यात सुरु आहेत. यावेळी सर्व्हेर डाऊनच्या अडचणी येत आहेत. यामुळे २१ ऑगस्ट रोजी पेपरची वेळ बदलण्याची नामुष्की परीक्षेचे आयोजन करणाऱ्यांवर आली. या प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप होत होता.

जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.