AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आला

महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कधीच रामराम ठोकला आहे. पण क्रिकेटबाबतचं त्याचं ज्ञान मुलाखातीच्या माध्यमातून अधूनमधून देत असतो. महेंद्रसिंह धोनीने विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत एक विधान केलं. त्यामुळे आता चाहत्यांच्या रडारवर आला आहे.

रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आला
रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आलाImage Credit source: PTI
| Updated on: Feb 04, 2026 | 4:33 PM
Share

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता दोघेही फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. या दोघांचं पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027वर लक्ष आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खरंच संधी मिळेल का? असा प्रश्न आहे. महेंद्रसिंह धोनीने या प्रश्नावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. महेंद्रसिंह धोनीच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वर्ल्डकप खेळायला हवा. त्यांच्यासाठी वय हा काय मापदंड नाही. कामगिरी आणि फिटनेसच्या जोरावर रोहित शर्मा-विराट कोहली यांना संघात स्थान मिळू शकते. पण महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

महेंद्रसिंह धोनी सांगितलं की, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2027 वनडे वर्ल्डकप का खेळू नये. माझ्या मते वय हा काय मापदंड नाही. पण कामगिरी आणि फिटनेस महत्त्वाचा आहे. कारण त्यांचं वय 30 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की ते खेळू शकत नाही. मोठ्या सामन्यात कायम अनुभव महत्त्वाचा असतो.’ धोनीचं म्हणणं विराट आणि रोहितच्या चाहत्यांना खूपच आवडलं. पण काही जणांना धोनीवर टीका करण्याची संधी मिळाली. एका चाहत्याने पोस्ट करत लिहिलं की, धोनी आज असं बोलत आहे कारण त्याने कर्णधारपद असताना दिग्गजांची चिंता केली नाही. दुसऱ्या चाहत्याने लिहिलं की, धोनीने फक्त सचिनला पाठिंबा दिला आणि त्याने सेहवाग, युवराज, हरभजन यांच्यासोबत काय केलं?

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात 2024 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं. आता तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या मते टीम इंडियाकडे जेतेपद मिळवण्याची सर्व क्षमता आहे. फक्त मैदानात पडणारं दव हा खूप मोठा टर्निंग प्वाइंट ठरणार आहे. त्याची चिंता त्याने या मुलाखतीत बोलून दाखवली. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा सामन्याच्या निकालाची स्थिती ठरवणार आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.