AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षांत 31,839 शेतमजूर आणि 35,950 विद्यार्थ्यांना मृत्यूला कवटाळले, लोकसभेत सरकारने दिली माहीती

2019 ते 2021 यातीन वर्षांत देशभरात 66,912 गृहीणींनी 53,661 स्वयंरोजगार करणाऱ्यांनी तर 43,420 पगारी व्यक्तींनी तर 43,385 बेरोजगारांनी मृत्यूला कवटाळ्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे.

तीन वर्षांत 31,839 शेतमजूर आणि 35,950 विद्यार्थ्यांना मृत्यूला कवटाळले, लोकसभेत सरकारने दिली माहीती
DEATHImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 14, 2023 | 10:50 AM
Share

नवी दिल्ली : देशभरात गेल्या तीन वर्षांत 1.12 लाख रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली आहे. केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी लोकसभेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची ही आकडेवारी जाहीर केली आहे, साल 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्याचा क्रमांक लागला आहे. त्यामुळे सरकारने असंघटीत क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी होत आहे.

2019 ते 2021 यातीन वर्षांत देशभरात 66,912 गृहीणींनी 53,661 स्वयंरोजगार करणाऱ्यांनी तर 43,420 पगारी व्यक्तींनी तर 43,385 बेरोजगारांनी मृत्यूला कवटाळत आपले जीवन संपविल्याचेही सरकारने म्हटले आहे. २०१९, २०२० आणि २०२१ अशा गेल्या तीन वर्षांत देशभरात आत्महत्या केलेल्यांमध्ये 35,950 विद्यार्थी आणि 31,839 शेती क्षेत्र आणि बागायतदार असल्याचे उघडकीस आल्याचे प्रश्नोत्तराच्या तासांत सरकारने लोकसभेत सांगितले.

असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, 2008 नुसार, सरकारला असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे बंधनकारक आहे, ज्यात रोजंदारी कामगारांचा समावेश केला असल्याचे सरकारने म्हटले आहे. जीवन आणि अपंगत्व संरक्षण, आरोग्य या विषयांवर कल्याणकारी योजना राबवते. तसेच मातांसाठी संरक्षण, वृद्धापकाळ संरक्षण, आणि केंद्र सरकारद्वारे अन्य फायदे असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दिले जातात असे सरकारने म्हटले आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) द्वारे जीवन आणि अपंगत्व कवच प्रदान केले जाते, ते म्हणाले .PMJJBY 18 ते 50 वयोगटातील बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते असलेल्या लोकांसाठी उपलब्ध आहे. ज्यांनी आपल्या खात्यातून हप्ते वळते करण्यास संमती दिली आहे, त्यांच्यासाठी ही योजना लागू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. या योजनेत जोखीमधारकाचा मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा मिळतो, त्यासाठी खातेधारकाच्या खात्यातून वार्षिक436 रूपयांचा हप्ता कापण्यात येतो. 31 डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेंतर्गत 14.82 कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे, असे ते म्हणाले.

या योजनेत जोखीमधारकाचा मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा मिळतो, त्यासाठी खातेधारकाच्या खात्यातून वार्षिक 436 रूपयांचा हप्ता कापण्यात येतो. 31 डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेंतर्गत 14.82कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे, असे ते म्हणाले.

Follow Us
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...