AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Serial Train Blast : 7 ब्लास्ट, 189 मृत्यू, 12 मुस्लीम आरोपींची सुटका होताच ओवैसींची पहिली प्रतिक्रिया काय?

Mumbai Serial Train Blast : आज हायकोर्टाने मुंबईत 2006 साली झालेल्या लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल दिला. या स्फोटांमध्ये 189 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 824 जखमी झाले होते. या प्रकरणातील 12 मुस्लिमांची निर्दोष सुटका होताच, असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया आली आहे.

Mumbai Serial Train Blast : 7 ब्लास्ट, 189 मृत्यू, 12 मुस्लीम आरोपींची सुटका होताच ओवैसींची पहिली प्रतिक्रिया काय?
असदुद्दीन ओवेसीImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 21, 2025 | 1:55 PM
Share

मुंबईत 2006 साली लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात हायकोर्टाने सर्व 12 दोषींची शिक्षा रद्द केली आहे. त्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला सवाल केला आहे. “या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र ATS च्या अधिकाऱ्यांविरोधात सरकार कारवाई करणार का? ज्यांच्यामुळे निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवण्यात आलं. आयुष्यातून आता चांगली वर्ष निघून गेल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका केली जाते” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. 2006 सालच्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सत्र न्यायालयाने सर्व 12 आरोपींना दोषी ठरवलं होतं. यात पाच जणांना फाशीची आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सोमवारी हायकोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली. शिक्षा झालेल्या 12 आरोपींपैकी एका आरोपीचा 2022 साली कोविडमुळे तुरुंगातच मृत्यू झाला होता.

ओवैसींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना लिहिलं की, “निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवलं जातं. अनेक वर्षानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होते, तेव्हा आयुष्य पुन्हा बनण्याची कुठलीही शक्यता नसते. मागच्या 17 वर्षांपासून हे आरोपी तुरुंगात आहेत. एकादिवसासाठी सुद्धा ते तुरुंगाबाहेर आले नाहीत. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली आहेत”

‘खूपदा निराश केलय’

“ज्या प्रकरणात जनाक्रोश असतो, पोलिसांची नेहमीच त्या बाबतीत अशीच भूमिका असते. आधी ते दोषी मानतात. नंतर ते मागे हटतात. अशा प्रकरणात पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेतात. तपास यंत्रणांनी अशा दहशतवादाच्या प्रकरणात खूपदा निराश केलय” असं ओवैसी म्हणाले.

‘बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक’

“दोषी ठरवण्यात आलेल्या 12 जणांपैकी अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं. फैसल आणि मुजम्मिल या दोन सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांचा मृत्यू झाला. 2023 साली त्यांच्या आईचा सुद्धा मृत्यू झाला. मोहम्मद माजिदच्या पत्नीचं पतीशी शेवटचं संभाषण होऊ शकलं नाही” असं AIMIM प्रमुखांनी सांगितलं.

स्पेशल कोर्टाचा निकाल

2006 साली मुंबई लोकल ट्रेनमध्ये 7 बॉम्बस्फोट झाले. यात 189 लोकांचा मृत्यू झाला. 824 जखमी झाले. या प्रकरणात सुनावणी दरम्यान 2015 साली स्पेशल कोर्टाने 12 आरोपींना दोषी ठरवलं. यात पाच जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप सुनावली. आता हायकोर्टाने आपल्या निर्णयात सर्व दोषींना दोषमुक्त ठरवून सुटका केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.