AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनयभंगाचा बदला घेण्यासाठी आरोपीने केले धक्कादायक कृत्य, नंतर तोंडावर आपटला; अंबरनाथ हादरले

अंबरनाथच्या जावसईमध्ये विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने फिर्यादीच्या वडील आणि भावावर खोटा खूनप्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या तपासात हा कट उघड झाला असून आरोपी तरुण आणि त्याचे साथीदार अटक करण्यात आले आहेत.

विनयभंगाचा बदला घेण्यासाठी आरोपीने केले धक्कादायक कृत्य, नंतर तोंडावर आपटला; अंबरनाथ हादरले
| Updated on: Jul 28, 2025 | 3:32 PM
Share

आपल्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने फिर्यादीच्या वडील आणि भावावर हत्येच्या प्रयत्नाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करत आरोपी तरुणासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथच्या जावसई परिसरात राहणाऱ्या आकाश अमरजित गुप्ता याच्यावर दोन वर्षांपूर्वी सोनल जैस्वार या तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी आकाशने सोनलचे वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला. आकाश गुप्ता याच्यासह त्याचा भाऊ कन्हैय्या गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य जैस्वार आणि अजित चौहान यांनी मिळून खुनाच्या प्रयत्नाचा बनाव रचला. या कटासाठी कन्हैय्याने वस्तरा आणला, मोनू कश्यप आणि आदित्य जैस्वारने ब्लेड आणले. सिद्धार्थ गायकवाड याने स्वतःच्याच मित्र अजित चौहानवर वार केले. त्यानंतर मोनू आणि आदित्यने अजित चौहानला तातडीने सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

पोलिसांचा तपास आणि कट उघड

यानंतर पोलिसांनी जखमी झालेल्या अजित चौहानचा रुग्णालयात जबाब नोंदवला. त्यावेळी त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सोनल जैस्वारचे वडील नागेंद्र जैस्वार आणि भाऊ आदित्य जैस्वार (पीडितेचा भाऊ) यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला नागेंद्र आणि आदित्य जैस्वार यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात गुन्हा घडल्याच्या वेळी नागेंद्र जैस्वार आणि आदित्य जैस्वार (पीडितेचा भाऊ) घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच, मागील विनयभंगाच्या गुन्ह्याचा संदर्भ मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

पोलिसांनी केलेल्या तपासात आकाश गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी नागेंद्र आणि आदित्य जैस्वार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा बनाव रचल्याचे समोर आले. यानंतर अंबरनाथ पोलिसांनी आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य जैस्वार आणि अजित चौहान या सर्व आरोपींविरोधात कट रचणे, खोटी माहिती पुरवणे, आणि गुन्ह्याचा खोटा आरोप करणे या कलमांखाली ‘सुमोटो’ गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ अटक केली. या प्रकरणाचा उलगडा अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि डीबी पथकाचे एपीआय विजय काजारी यांच्या सतर्कतेमुळे झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.