AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Murder : पत्नीला पळविल्याचा राग, प्रियकराच्या वडिलांनाच संपविले, चंद्रपुरातील माजरी पोलीस हद्दीतील घटना

कोराडी येथील नाल्याजवळ नेले. दोन मित्रांच्या मदतीनं त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून ते परत आले. माजरी पोलिसांनी या प्रकरणाची छडा लावला.

Chandrapur Murder : पत्नीला पळविल्याचा राग, प्रियकराच्या वडिलांनाच संपविले, चंद्रपुरातील माजरी पोलीस हद्दीतील घटना
चंद्रपुरातील माजरी पोलीस हद्दीतील घटना Image Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 24, 2022 | 2:58 PM
Share

चंद्रपूर : पत्नीला पळवून नेले म्हणून पती निराश झाला. पत्नीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. काही दिवंसापूर्वी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल (Crime of Murder) करून तपासाला सुरुवात केली. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. 50 वर्षीय मृतक रामभाऊ पाटील (Rambhau Patil) हे माजरी कॉलनी (Majri Colony) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये मृतकाच्या मुलाचे आरोपी आशिष पेटकर याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे आणि त्याने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.

आरोपीला पाच दिवसांची कोठडी

माझ्या पत्नीला का पळवून नेले. म्हणून युवकाच्या वडिलांवर तो राग काढला. आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने पूरग्रस्त छावणीत प्रवेश केला. मृतकाला चारचाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून कोराडी नाल्याजवळ नेले. त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

आशिष पेटकर याच्या पत्नीचे दुसऱ्या एका युवकावर प्रेम जळले. ती रामभाऊ पाटील यांच्या मुलासोबत पळून गेली. याचा प्रचंड राग आशिषला आला. तो रागाच्या भरात रामभाऊच्या घरी गेला. पण, मुलगा तिथं नव्हता. रामभाऊ भेटले. त्यांनाच आशिषने चारचाकी गाडीत बसविले. कोराडी येथील नाल्याजवळ नेले. दोन मित्रांच्या मदतीनं त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून ते परत आले. माजरी पोलिसांनी या प्रकरणाची छडा लावला. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पत्नी सोडून गेली. म्हणून संताप व्यक्त करण्यात काही अर्थ नव्हता. शांत राहून डोकं ठिकाणावर ठेवून पुढचा मार्ग शोधता आला असता. पण, संतापाच्या भरात खून करून आशिषला आता पश्चातापाशिवाय काही पर्याय नाही.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?